शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

By विकास राऊत | Updated: October 27, 2023 12:04 IST

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन, नुकसान आदी निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. बीड सोडून इतर जिल्ह्यांत पाऊस आणि उत्पादन यावरून विमा कंपन्यांनी विश्लेषणाची भूमिका घेतली आहे. परिणामी दिवाळीपूर्वी हा तांत्रिक तंटा सुटला नाही तर शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम मिळणे अवघड होणार आहे. बीड जिल्ह्यातील ८६ मंडळातील पाऊस आणि उत्पादनांच्या निकषाचे प्रकरण राज्य तांत्रिक सल्लागार समितीने निकाली काढले आहे.

दिवाळी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कंपन्यांनी अजून काहीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. असे चित्र सध्या तरी आहे. शासनाकडे याबाबत निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.

१०० टक्के नुकसान अमान्य१०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कंपन्या स्वीकारण्यास तयार नाही. मंडळनिहाय पावसाचा खंड हे देखील कंपन्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे. काही कंपन्यांनी पिकांनुसार देखील विमा देण्याचे निकष ठरविले आहेत. त्यात सोयाबीन, कापूस, बाजरीला विमा मिळणार नाही. १०० टक्के नुकसान, शून्य टक्के उत्पादन असे होतच नसते. ६२ टक्के नुकसान कंपन्या स्वीकारण्यास तयार आहेत. ३ आठवडे पावसाचा खंड ही कंपन्या गृहीत धरणार आहेत. निकषात बसणाऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा मिळेल. असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कसा गेला यंदाचा पावसाळा ?कापूस, मका, सोयाबीन पेरणी : ४० लाख हेक्टरविमा काढला : ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनीविमा संरक्षित रक्कम : २३ हजार ७७६ कोटी ६६ लाखऑगस्ट : महिना पूर्णत: कोरडा२१ दिवसांपेक्षा अधिक खंड : २५० मंडळांत

किती दिवस पाऊस : १२२ पैकी ४० दिवसआठ जिल्ह्यात किती पाऊस? : ८५.५ टक्केकिती पावसाची तूट : १५ टक्केवार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी.किती पाऊस झाला? : ५८१.५ मिमी.मागील वर्षीचा पाऊस : ७६९.७ मिमी. (११३ टक्के)

विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरीजिल्हा..........अर्जदार शेतकरीछत्रपती संभाजीनगर : ११५०८४४जालना : १०१५९३२बीड : १८५०५५२लातूर : ८६३०१७धाराशिव : ७५७७७१नांदेड : ११९७७४४परभणी : ७६३०७६हिंगोली : ५१२४४७एकूण : ८१११३७४

काय म्हणाले विभागीय आयुक्त ?मराठवाड्यात २५० मंडळांत पावसाचा खंड होता. तेथे २५ टक्के अग्रीम विम्याची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. परंतु प्रीमियम न भरल्याची, उत्पादन, मंडळनिहाय पावसाचे निकषांची अडचण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. शासन यामध्ये निर्णय घेईल.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या कंपन्यांकडे जबाबदारी?छत्रपती संभाजीनगर : चाेलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं.लि., जालना : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि., बीड : भारतीय कृषी विमा कंपनी, लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि., धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि., परभणी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि., नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., हिंगोली : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपन्यांकडे विमा रक्कम देण्याची जबाबदारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र