शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

By विकास राऊत | Updated: October 27, 2023 12:04 IST

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन, नुकसान आदी निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. बीड सोडून इतर जिल्ह्यांत पाऊस आणि उत्पादन यावरून विमा कंपन्यांनी विश्लेषणाची भूमिका घेतली आहे. परिणामी दिवाळीपूर्वी हा तांत्रिक तंटा सुटला नाही तर शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम मिळणे अवघड होणार आहे. बीड जिल्ह्यातील ८६ मंडळातील पाऊस आणि उत्पादनांच्या निकषाचे प्रकरण राज्य तांत्रिक सल्लागार समितीने निकाली काढले आहे.

दिवाळी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कंपन्यांनी अजून काहीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. असे चित्र सध्या तरी आहे. शासनाकडे याबाबत निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.

१०० टक्के नुकसान अमान्य१०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कंपन्या स्वीकारण्यास तयार नाही. मंडळनिहाय पावसाचा खंड हे देखील कंपन्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे. काही कंपन्यांनी पिकांनुसार देखील विमा देण्याचे निकष ठरविले आहेत. त्यात सोयाबीन, कापूस, बाजरीला विमा मिळणार नाही. १०० टक्के नुकसान, शून्य टक्के उत्पादन असे होतच नसते. ६२ टक्के नुकसान कंपन्या स्वीकारण्यास तयार आहेत. ३ आठवडे पावसाचा खंड ही कंपन्या गृहीत धरणार आहेत. निकषात बसणाऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा मिळेल. असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कसा गेला यंदाचा पावसाळा ?कापूस, मका, सोयाबीन पेरणी : ४० लाख हेक्टरविमा काढला : ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनीविमा संरक्षित रक्कम : २३ हजार ७७६ कोटी ६६ लाखऑगस्ट : महिना पूर्णत: कोरडा२१ दिवसांपेक्षा अधिक खंड : २५० मंडळांत

किती दिवस पाऊस : १२२ पैकी ४० दिवसआठ जिल्ह्यात किती पाऊस? : ८५.५ टक्केकिती पावसाची तूट : १५ टक्केवार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी.किती पाऊस झाला? : ५८१.५ मिमी.मागील वर्षीचा पाऊस : ७६९.७ मिमी. (११३ टक्के)

विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरीजिल्हा..........अर्जदार शेतकरीछत्रपती संभाजीनगर : ११५०८४४जालना : १०१५९३२बीड : १८५०५५२लातूर : ८६३०१७धाराशिव : ७५७७७१नांदेड : ११९७७४४परभणी : ७६३०७६हिंगोली : ५१२४४७एकूण : ८१११३७४

काय म्हणाले विभागीय आयुक्त ?मराठवाड्यात २५० मंडळांत पावसाचा खंड होता. तेथे २५ टक्के अग्रीम विम्याची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. परंतु प्रीमियम न भरल्याची, उत्पादन, मंडळनिहाय पावसाचे निकषांची अडचण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. शासन यामध्ये निर्णय घेईल.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या कंपन्यांकडे जबाबदारी?छत्रपती संभाजीनगर : चाेलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं.लि., जालना : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि., बीड : भारतीय कृषी विमा कंपनी, लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि., धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि., परभणी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि., नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., हिंगोली : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपन्यांकडे विमा रक्कम देण्याची जबाबदारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र