शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

By विकास राऊत | Updated: October 27, 2023 12:04 IST

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन, नुकसान आदी निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. बीड सोडून इतर जिल्ह्यांत पाऊस आणि उत्पादन यावरून विमा कंपन्यांनी विश्लेषणाची भूमिका घेतली आहे. परिणामी दिवाळीपूर्वी हा तांत्रिक तंटा सुटला नाही तर शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम मिळणे अवघड होणार आहे. बीड जिल्ह्यातील ८६ मंडळातील पाऊस आणि उत्पादनांच्या निकषाचे प्रकरण राज्य तांत्रिक सल्लागार समितीने निकाली काढले आहे.

दिवाळी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कंपन्यांनी अजून काहीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. असे चित्र सध्या तरी आहे. शासनाकडे याबाबत निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.

१०० टक्के नुकसान अमान्य१०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कंपन्या स्वीकारण्यास तयार नाही. मंडळनिहाय पावसाचा खंड हे देखील कंपन्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे. काही कंपन्यांनी पिकांनुसार देखील विमा देण्याचे निकष ठरविले आहेत. त्यात सोयाबीन, कापूस, बाजरीला विमा मिळणार नाही. १०० टक्के नुकसान, शून्य टक्के उत्पादन असे होतच नसते. ६२ टक्के नुकसान कंपन्या स्वीकारण्यास तयार आहेत. ३ आठवडे पावसाचा खंड ही कंपन्या गृहीत धरणार आहेत. निकषात बसणाऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा मिळेल. असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कसा गेला यंदाचा पावसाळा ?कापूस, मका, सोयाबीन पेरणी : ४० लाख हेक्टरविमा काढला : ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनीविमा संरक्षित रक्कम : २३ हजार ७७६ कोटी ६६ लाखऑगस्ट : महिना पूर्णत: कोरडा२१ दिवसांपेक्षा अधिक खंड : २५० मंडळांत

किती दिवस पाऊस : १२२ पैकी ४० दिवसआठ जिल्ह्यात किती पाऊस? : ८५.५ टक्केकिती पावसाची तूट : १५ टक्केवार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी.किती पाऊस झाला? : ५८१.५ मिमी.मागील वर्षीचा पाऊस : ७६९.७ मिमी. (११३ टक्के)

विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरीजिल्हा..........अर्जदार शेतकरीछत्रपती संभाजीनगर : ११५०८४४जालना : १०१५९३२बीड : १८५०५५२लातूर : ८६३०१७धाराशिव : ७५७७७१नांदेड : ११९७७४४परभणी : ७६३०७६हिंगोली : ५१२४४७एकूण : ८१११३७४

काय म्हणाले विभागीय आयुक्त ?मराठवाड्यात २५० मंडळांत पावसाचा खंड होता. तेथे २५ टक्के अग्रीम विम्याची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. परंतु प्रीमियम न भरल्याची, उत्पादन, मंडळनिहाय पावसाचे निकषांची अडचण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. शासन यामध्ये निर्णय घेईल.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या कंपन्यांकडे जबाबदारी?छत्रपती संभाजीनगर : चाेलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं.लि., जालना : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि., बीड : भारतीय कृषी विमा कंपनी, लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि., धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि., परभणी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि., नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., हिंगोली : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपन्यांकडे विमा रक्कम देण्याची जबाबदारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र