शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

 सिल्लोड तालुक्यात टँकरने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:41 IST

भर हिवाळ्यात ५० गावांत पाणीबाणी : कन्नड तालुक्यातून आणावे लागते पाणी

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, भर हिवाळ्यात टँकरने शंभरी गाठली आहे. ५० गावांत तब्बल ९५ हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ६ गावांची अजून मागणी आली आहे.जानेवारीअखेर टँकरची संख्या दीडशेच्या वर जाण्याची शक्यता आहे. मार्चअखेर ३०० टँकर लागल्यास आश्चर्य वाटू नये, एवढी भीषण दाहकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील केळगाव मध्यम प्रकल्प वगळता सर्वच मध्यम प्रकल्प कोरडे असल्याने कन्नड तालुक्यातून सिल्लोड तालुक्यासाठी पाणी आणावे लागत आहे.तालुक्यात एकूण १३१ गावे असून, यापैकी तब्बल ५० गावे टँकरवर अवलंबून आहेत. जानेवारीअखेर यात आणखी २० गावे वाढतील. शिवना, आमसरी, नाटवी, मादणी, पिंपळगाव पेठ, वांगी बु. या ६ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.यंदा पावसाने दगा दिल्याने खरिपाची पिके तर गेलीच, शिवाय हिवाळ्यातच पाणीटंचाईचा प्रश्न निर्णाण झाला आहे. तालुक्यातील मध्यम, लघु, साठवण प्रकल्पांसह विहिरी, नदी, नाले-कोरडे पडले आहेत. जानेवारीतच पाणीबाणी निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी पुढील सहा महिने प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.टँकर सुरू असलेली गावेतालुक्यातील मांडगाव, बाळापूर, डिग्रस, पानस, बोदवड, सराटी, बनकिन्होळा, धोत्रा, पालोदवाडी, बहुली, वरूड, आसडी, खुपटा, खातखेडा, पानवडोद खुर्द, वडोद चाथा, गव्हाली तांडा, निल्लोड, रहिमाबाद, पिंपळदरी, पिंप्री, लोणवाडी, गव्हाली, जळकी बाजार, उपळी, म्हसला बु., तलवाडा, धानोरा, देऊळगाव बाजार, पिरोळा डोईफोडा, बाभूळगाव, दीडगाव, केºहाळा, म्हसला खुर्द, पळशी, अनाड, भवन, बोरगाव कासारी, टाकळी जिवरग, ////////////मोढा बुर्द,//////// अंधारी, गेवराई सेमी, बोजगाव, रेलगाव, सोनाप्पावाडी, बोरगाव सारवणी, खेडी भायगाव, चिंचखेडा, वडाळा, जुना पानेवाडी या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, मोढा खुर्द या ६ गावांसाठी १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.खेळणा प्रकल्प जोत्याखालीसिल्लोड तालुक्यात खेळणा व अजिंठा-अंधारी हे दोन मध्यम प्रकल्प, केळगाव, रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड, पेंडगाव-चारनेर, असे पाच लघु प्रकल्प, तर हळदा-जळकी साठवण तलाव, असे आठ प्रकल्प आहेत. यात रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड प्रकल्प कोरडे पडले असून, पेंडगाव- चारनेर, अजिंठा- अंधारी व खेळणा प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. हळदा- जळकी साठवण तलावात १३ टक्के व केळगाव लघु प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा आहे. यात खेळणा प्रकल्पावर सिल्लोड शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. खेळणा प्रकल्पही जोत्याखाली आला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात