शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

 सिल्लोड तालुक्यात टँकरने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:41 IST

भर हिवाळ्यात ५० गावांत पाणीबाणी : कन्नड तालुक्यातून आणावे लागते पाणी

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, भर हिवाळ्यात टँकरने शंभरी गाठली आहे. ५० गावांत तब्बल ९५ हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ६ गावांची अजून मागणी आली आहे.जानेवारीअखेर टँकरची संख्या दीडशेच्या वर जाण्याची शक्यता आहे. मार्चअखेर ३०० टँकर लागल्यास आश्चर्य वाटू नये, एवढी भीषण दाहकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील केळगाव मध्यम प्रकल्प वगळता सर्वच मध्यम प्रकल्प कोरडे असल्याने कन्नड तालुक्यातून सिल्लोड तालुक्यासाठी पाणी आणावे लागत आहे.तालुक्यात एकूण १३१ गावे असून, यापैकी तब्बल ५० गावे टँकरवर अवलंबून आहेत. जानेवारीअखेर यात आणखी २० गावे वाढतील. शिवना, आमसरी, नाटवी, मादणी, पिंपळगाव पेठ, वांगी बु. या ६ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.यंदा पावसाने दगा दिल्याने खरिपाची पिके तर गेलीच, शिवाय हिवाळ्यातच पाणीटंचाईचा प्रश्न निर्णाण झाला आहे. तालुक्यातील मध्यम, लघु, साठवण प्रकल्पांसह विहिरी, नदी, नाले-कोरडे पडले आहेत. जानेवारीतच पाणीबाणी निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी पुढील सहा महिने प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.टँकर सुरू असलेली गावेतालुक्यातील मांडगाव, बाळापूर, डिग्रस, पानस, बोदवड, सराटी, बनकिन्होळा, धोत्रा, पालोदवाडी, बहुली, वरूड, आसडी, खुपटा, खातखेडा, पानवडोद खुर्द, वडोद चाथा, गव्हाली तांडा, निल्लोड, रहिमाबाद, पिंपळदरी, पिंप्री, लोणवाडी, गव्हाली, जळकी बाजार, उपळी, म्हसला बु., तलवाडा, धानोरा, देऊळगाव बाजार, पिरोळा डोईफोडा, बाभूळगाव, दीडगाव, केºहाळा, म्हसला खुर्द, पळशी, अनाड, भवन, बोरगाव कासारी, टाकळी जिवरग, ////////////मोढा बुर्द,//////// अंधारी, गेवराई सेमी, बोजगाव, रेलगाव, सोनाप्पावाडी, बोरगाव सारवणी, खेडी भायगाव, चिंचखेडा, वडाळा, जुना पानेवाडी या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, मोढा खुर्द या ६ गावांसाठी १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.खेळणा प्रकल्प जोत्याखालीसिल्लोड तालुक्यात खेळणा व अजिंठा-अंधारी हे दोन मध्यम प्रकल्प, केळगाव, रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड, पेंडगाव-चारनेर, असे पाच लघु प्रकल्प, तर हळदा-जळकी साठवण तलाव, असे आठ प्रकल्प आहेत. यात रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड प्रकल्प कोरडे पडले असून, पेंडगाव- चारनेर, अजिंठा- अंधारी व खेळणा प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. हळदा- जळकी साठवण तलावात १३ टक्के व केळगाव लघु प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा आहे. यात खेळणा प्रकल्पावर सिल्लोड शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. खेळणा प्रकल्पही जोत्याखाली आला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात