शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १० जलकुंभाचे यापूर्वीच आयुष्य संपले!

By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST

औरंगाबाद : शहरात नगर परिषदेच्या काळात बांधण्यात आलेल्या दहापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात नगर परिषदेच्या काळात बांधण्यात आलेल्या दहापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले असून, त्यांची पडझड आता सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला. त्यानंतर शहरातील जीर्ण पाण्याच्या टाक्यांचा मुद्या ऐरणीवर आला आहे. मागील २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या १३ पाण्याच्या टाक्या वापराविना पडून आहेत. त्याचा वापर आता मनपाला करता येणार नाही. मोडकळीस आलेल्या आणि वापर नसलेल्या २३ पाण्याच्या टाक्या भुईसपाट करण्याशिवाय मनपाकडे कोणताच पर्याय उरलेला नाही.शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका सध्या ५० पाण्याच्या टाक्यांचा वापर करीत आहे. त्यातील १० टाक्यांचे आयुष्य यापूर्वीच संपले आहे. नगर परिषदेच्या काळात या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी या पाण्याच्या टाक्या कोसळू शकतात. त्यामध्ये सिडको एन-७, संजयनगर जिन्सी, क्रांतीचौक, सिडको एन-५ येथील टाक्यांचा समावेश आहे. क्रांतीचौक आणि एन-५ येथील पाण्याच्या टाक्यांचा स्लॅब यापूर्वीच कोसळला आहे. १९८५ मध्ये जिन्सी मैदानावरील पाण्याची टाकी अशाच पद्धतीने कोसळली होती. आसपास घरे नसल्याने कोणतेच नुकसान झाले नाही. सध्या धोकादायक बनलेल्या दहा पाण्याच्या टाक्यांचा वापर अचानकपणे बंद केल्यास शहरात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू होईल. मनपाकडे पर्यायी व्यवस्थाच नाही. सिडको एन-७ येथील पाण्याची टाकी बंद केली तर १३ वॉर्डांना पाणीपुरवठा कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशीच अवस्था संजयनगर जिन्सी येथील पाण्याच्या टाकीची आहे. महापालिकेला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार हे निश्चित.शहरातील जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा, अशी मागणी दोन वर्षांपासून नगरसेवक करीत आहेत. प्रशासन मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रशासनाला प्रतीक्षा आहे का...? असा प्रश्नही नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.