शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १० जलकुंभाचे यापूर्वीच आयुष्य संपले!

By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST

औरंगाबाद : शहरात नगर परिषदेच्या काळात बांधण्यात आलेल्या दहापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात नगर परिषदेच्या काळात बांधण्यात आलेल्या दहापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले असून, त्यांची पडझड आता सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला. त्यानंतर शहरातील जीर्ण पाण्याच्या टाक्यांचा मुद्या ऐरणीवर आला आहे. मागील २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या १३ पाण्याच्या टाक्या वापराविना पडून आहेत. त्याचा वापर आता मनपाला करता येणार नाही. मोडकळीस आलेल्या आणि वापर नसलेल्या २३ पाण्याच्या टाक्या भुईसपाट करण्याशिवाय मनपाकडे कोणताच पर्याय उरलेला नाही.शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका सध्या ५० पाण्याच्या टाक्यांचा वापर करीत आहे. त्यातील १० टाक्यांचे आयुष्य यापूर्वीच संपले आहे. नगर परिषदेच्या काळात या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी या पाण्याच्या टाक्या कोसळू शकतात. त्यामध्ये सिडको एन-७, संजयनगर जिन्सी, क्रांतीचौक, सिडको एन-५ येथील टाक्यांचा समावेश आहे. क्रांतीचौक आणि एन-५ येथील पाण्याच्या टाक्यांचा स्लॅब यापूर्वीच कोसळला आहे. १९८५ मध्ये जिन्सी मैदानावरील पाण्याची टाकी अशाच पद्धतीने कोसळली होती. आसपास घरे नसल्याने कोणतेच नुकसान झाले नाही. सध्या धोकादायक बनलेल्या दहा पाण्याच्या टाक्यांचा वापर अचानकपणे बंद केल्यास शहरात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू होईल. मनपाकडे पर्यायी व्यवस्थाच नाही. सिडको एन-७ येथील पाण्याची टाकी बंद केली तर १३ वॉर्डांना पाणीपुरवठा कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशीच अवस्था संजयनगर जिन्सी येथील पाण्याच्या टाकीची आहे. महापालिकेला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार हे निश्चित.शहरातील जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा, अशी मागणी दोन वर्षांपासून नगरसेवक करीत आहेत. प्रशासन मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रशासनाला प्रतीक्षा आहे का...? असा प्रश्नही नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.