शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

संकटग्रस्त बालकांसाठी ‘१०९८’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST

कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.

ठळक मुद्देत्वरित मदत : चाईल्ड हेल्पलाईनवर औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज ४० ते ५० फोन कॉल्स; स्वयंसेवक धावताहेत मदतीला

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.जन्माला आलेल्या, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे; मात्र आपल्या समाजात बालकांच्या प्रश्नाकडे आजही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक बालकांना घरातच अत्याचार सहन करावा लागत आहे. काही बाळांना भूल देऊन भिकारी त्यांचा भावनिक वापर करून घेत आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांच्याही समस्या आहेत. अनेकदा मूल घरचा रस्ता विसरतात, हरवतात. संकटात सापडतात, कोण्या बालकाचा अपघात झाला आहे, अशा संकटाच्या वेळी त्या संकटग्रस्त बालकांनी किंवा पालक, नातेवाईक वा घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कोणीही १०९८ या नंबरवर फोन केला, तर त्या मुलाला त्वरित मदत मिळू शकते. यासाठी जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईनची सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात चाईल्ड लाईन सुरू करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र समन्वयक, समुपदेशक, सदस्य, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे.मागील ११ मेपासून चाईल्ड लाईनची सुरुवात झाली असून, दररोज जिल्ह्यातून ४० ते ५० कॉल्स येत असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी दिली.२४ तास सुरू चाईल्ड हेल्पलाईन० ते १८ वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असते. काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाºया मुलांसाठीही संस्था काम करते. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संस्थेतर्फे तातडीने मदत पुरविण्यात येते. महिला आणि बालविकास या केंद्रीय मंत्रालयाचा चाईल्ड लाईनला आधार आहे. चाईल्ड लाईन हे राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेली असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांनी दिली.शाळांमधून करणार जनजागृतीएमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनचे कार्य व १०९८ हा टोल फ्री फोननंबरची माहिती देण्यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक