शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

संकटग्रस्त बालकांसाठी ‘१०९८’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST

कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.

ठळक मुद्देत्वरित मदत : चाईल्ड हेल्पलाईनवर औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज ४० ते ५० फोन कॉल्स; स्वयंसेवक धावताहेत मदतीला

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.जन्माला आलेल्या, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे; मात्र आपल्या समाजात बालकांच्या प्रश्नाकडे आजही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक बालकांना घरातच अत्याचार सहन करावा लागत आहे. काही बाळांना भूल देऊन भिकारी त्यांचा भावनिक वापर करून घेत आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांच्याही समस्या आहेत. अनेकदा मूल घरचा रस्ता विसरतात, हरवतात. संकटात सापडतात, कोण्या बालकाचा अपघात झाला आहे, अशा संकटाच्या वेळी त्या संकटग्रस्त बालकांनी किंवा पालक, नातेवाईक वा घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कोणीही १०९८ या नंबरवर फोन केला, तर त्या मुलाला त्वरित मदत मिळू शकते. यासाठी जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईनची सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात चाईल्ड लाईन सुरू करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र समन्वयक, समुपदेशक, सदस्य, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे.मागील ११ मेपासून चाईल्ड लाईनची सुरुवात झाली असून, दररोज जिल्ह्यातून ४० ते ५० कॉल्स येत असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी दिली.२४ तास सुरू चाईल्ड हेल्पलाईन० ते १८ वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असते. काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाºया मुलांसाठीही संस्था काम करते. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संस्थेतर्फे तातडीने मदत पुरविण्यात येते. महिला आणि बालविकास या केंद्रीय मंत्रालयाचा चाईल्ड लाईनला आधार आहे. चाईल्ड लाईन हे राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेली असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांनी दिली.शाळांमधून करणार जनजागृतीएमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनचे कार्य व १०९८ हा टोल फ्री फोननंबरची माहिती देण्यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक