शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:48 IST

वैजापूर तालुका जिल्ह्यात अव्वल : अनंत अडचणींचा सामना करुन नोंदवला विक्रम

वैजापूर : पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै या अंतिम दिवसापर्यंत तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी पीक विमा काढला. विशेष म्हणजे या विम्याचे अर्ज भरण्यासाठी दररोज आॅनलाइन केंद्रावर सर्व्हर डाऊनची डोकेदुखी असतानाही जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरण्याचा विक्रम तालुक्यातील शेतकºयांनी केल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.तालुक्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप पिकांवर अवलंबून आहे. परंतु दोन महिन्यांपासून अनेक संकटांमुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघणार नसल्याचे ध्यानी घेऊन पीक विम्याला पसंती दिली.त्यामुळे तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरण्याचा विक्रम केला. कापूस ३० हजार १३३, मूग १० हजार ९१३, मका २३ हजार १५१ आदी पिकांचा विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. तालुका बंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून अजून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात २०१७ मध्ये विमा कंपनीने नुकसान होऊनही शेतकºयांना मदत नाकारली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर शासनाने याची दखल घेऊन या कंपनीकडून तालुक्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी दुसºया कंपनीकडे दिले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान, तांत्रिक कारणामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान १५ दिवस विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांमधून होत आहे.दुष्काळाची धास्तीदोन महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर दुष्काळाचे वास्तव दिसत असल्याने शेतकºयांनी शेवटचा पर्याय म्हणून पीक विम्यावर सर्वाधिक सट्टा लावण्याचे धाडस केले. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी कापूस, मका, मूग पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले. विमा अर्ज भरण्यासाठी प्रशासनाने सात दिवसांची मुदतवाढ दिली होती, मात्र या सात दिवसांत चार ते पाच दिवस पूर्ण वेळ आॅनलाइन पोर्टल बंद होते. यापूर्वीही दररोज सर्व्हर डाऊनची समस्या आल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस अर्ज भरण्यासाठी संगणकासमोर बसून होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांना अर्ज करत येत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी