शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

१ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:48 IST

वैजापूर तालुका जिल्ह्यात अव्वल : अनंत अडचणींचा सामना करुन नोंदवला विक्रम

वैजापूर : पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै या अंतिम दिवसापर्यंत तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी पीक विमा काढला. विशेष म्हणजे या विम्याचे अर्ज भरण्यासाठी दररोज आॅनलाइन केंद्रावर सर्व्हर डाऊनची डोकेदुखी असतानाही जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरण्याचा विक्रम तालुक्यातील शेतकºयांनी केल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.तालुक्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप पिकांवर अवलंबून आहे. परंतु दोन महिन्यांपासून अनेक संकटांमुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघणार नसल्याचे ध्यानी घेऊन पीक विम्याला पसंती दिली.त्यामुळे तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरण्याचा विक्रम केला. कापूस ३० हजार १३३, मूग १० हजार ९१३, मका २३ हजार १५१ आदी पिकांचा विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. तालुका बंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून अजून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात २०१७ मध्ये विमा कंपनीने नुकसान होऊनही शेतकºयांना मदत नाकारली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर शासनाने याची दखल घेऊन या कंपनीकडून तालुक्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी दुसºया कंपनीकडे दिले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान, तांत्रिक कारणामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान १५ दिवस विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांमधून होत आहे.दुष्काळाची धास्तीदोन महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर दुष्काळाचे वास्तव दिसत असल्याने शेतकºयांनी शेवटचा पर्याय म्हणून पीक विम्यावर सर्वाधिक सट्टा लावण्याचे धाडस केले. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी कापूस, मका, मूग पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले. विमा अर्ज भरण्यासाठी प्रशासनाने सात दिवसांची मुदतवाढ दिली होती, मात्र या सात दिवसांत चार ते पाच दिवस पूर्ण वेळ आॅनलाइन पोर्टल बंद होते. यापूर्वीही दररोज सर्व्हर डाऊनची समस्या आल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस अर्ज भरण्यासाठी संगणकासमोर बसून होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांना अर्ज करत येत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी