शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

१ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:48 IST

वैजापूर तालुका जिल्ह्यात अव्वल : अनंत अडचणींचा सामना करुन नोंदवला विक्रम

वैजापूर : पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै या अंतिम दिवसापर्यंत तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी पीक विमा काढला. विशेष म्हणजे या विम्याचे अर्ज भरण्यासाठी दररोज आॅनलाइन केंद्रावर सर्व्हर डाऊनची डोकेदुखी असतानाही जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरण्याचा विक्रम तालुक्यातील शेतकºयांनी केल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.तालुक्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप पिकांवर अवलंबून आहे. परंतु दोन महिन्यांपासून अनेक संकटांमुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघणार नसल्याचे ध्यानी घेऊन पीक विम्याला पसंती दिली.त्यामुळे तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरण्याचा विक्रम केला. कापूस ३० हजार १३३, मूग १० हजार ९१३, मका २३ हजार १५१ आदी पिकांचा विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. तालुका बंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून अजून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात २०१७ मध्ये विमा कंपनीने नुकसान होऊनही शेतकºयांना मदत नाकारली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर शासनाने याची दखल घेऊन या कंपनीकडून तालुक्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी दुसºया कंपनीकडे दिले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान, तांत्रिक कारणामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान १५ दिवस विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांमधून होत आहे.दुष्काळाची धास्तीदोन महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर दुष्काळाचे वास्तव दिसत असल्याने शेतकºयांनी शेवटचा पर्याय म्हणून पीक विम्यावर सर्वाधिक सट्टा लावण्याचे धाडस केले. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी कापूस, मका, मूग पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले. विमा अर्ज भरण्यासाठी प्रशासनाने सात दिवसांची मुदतवाढ दिली होती, मात्र या सात दिवसांत चार ते पाच दिवस पूर्ण वेळ आॅनलाइन पोर्टल बंद होते. यापूर्वीही दररोज सर्व्हर डाऊनची समस्या आल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस अर्ज भरण्यासाठी संगणकासमोर बसून होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांना अर्ज करत येत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी