शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:29 IST

चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. नक्षत्रवाडी येथे एसटीपी प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी वापरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

चिकलठाणा येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वीजपुरवठा मिळत नसल्याने महापालिकेच्या अडचणीत भर पडत आहे. शुक्रवारी वीज वितरण कंपनीने या कामाची साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे दोन आठवड्यात मनपाला वीज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजेची अडचण दूर होताच आता पाणी प्रश्नाने डोके वर काढले आहे.

या प्रकल्पासाठी दररोज १ लाख लिटर पाणी लागणार आहे. त्यानुसार टाकीचे बांधकामही करण्यात आले आहे. या भागात पाण्याचाच पत्ता नाही. एक विंधन विहीर असून, या बोअरचे पाणी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरातून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेले पाणी टँकरने पुरवठा करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.कचरा कोंडीनंतर पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी, चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला.

चिकलठाणा वगळता इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. चिकलठाण्यात छोट्या १६ टन क्षमतेच्या दोन मशीनद्वारे सध्या दररोज ३२ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा अजब दावाही मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिवसभरात एक टन कचºयावरही प्रक्रिया होत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. छोट्या मशीनद्वारे कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद