शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:29 IST

चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. नक्षत्रवाडी येथे एसटीपी प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी वापरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

चिकलठाणा येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वीजपुरवठा मिळत नसल्याने महापालिकेच्या अडचणीत भर पडत आहे. शुक्रवारी वीज वितरण कंपनीने या कामाची साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे दोन आठवड्यात मनपाला वीज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजेची अडचण दूर होताच आता पाणी प्रश्नाने डोके वर काढले आहे.

या प्रकल्पासाठी दररोज १ लाख लिटर पाणी लागणार आहे. त्यानुसार टाकीचे बांधकामही करण्यात आले आहे. या भागात पाण्याचाच पत्ता नाही. एक विंधन विहीर असून, या बोअरचे पाणी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरातून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेले पाणी टँकरने पुरवठा करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.कचरा कोंडीनंतर पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी, चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला.

चिकलठाणा वगळता इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. चिकलठाण्यात छोट्या १६ टन क्षमतेच्या दोन मशीनद्वारे सध्या दररोज ३२ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा अजब दावाही मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिवसभरात एक टन कचºयावरही प्रक्रिया होत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. छोट्या मशीनद्वारे कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद