शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

झेडपी कर्मचाऱ्यांची वाताहत थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे.

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २५ ते ३० वर्षे सेवा करूनही जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या कार्यालयात सेवा केली त्याच कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर येते. असे अनेक प्रकार आजपर्यंत घडले आहे. आता मात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात सर्व लाभांसह त्यांचा सत्कार करण्याचे आदेश सीईओंनी विभागप्रमुखांना दिले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी सीईओ डाॅ. मिताली सेठी यांनी सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठविले असून सेवानिवृत्ती लाभासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा त्याच महिन्याच्या शेवटी सत्कार करण्याचे म्हटले आहे.  यामुळे यापुढे तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर लाभ मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियममहाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ नुसार कर्मचारी सेवेतून नियत वयोमान सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, कुटूंब निवृत्ती वेतन, वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्ती, सक्तीने सेवानिवृत्ती इ. सर्व प्रकरणे, सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ अदा करणे गरजेचे आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवानिवृत्तीचे दिवशी आर्थिक लाभाचे धनादेश त्याच दिवशी सन्मानपूर्वक वितरित करणे आवश्यक आहे.

दर महिन्याच्या शेवटी  होणार सत्कार- सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकवेळा कर्मचाऱ्यांचा साधा सत्कार केला जात नाही. एवढेच नाही तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ सुद्धा वेळेवर दिल्या जात नाही. त्यामुळे अनेकवेळा कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता वेळेवर लाभ तसेच सेवानिवृत्तीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कारसुद्धा केला जाणार आहे.

उंबरठे झिजवणे होणार बंदएकदा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन, गटविमा, उपदान, भविष्य निर्वाहनिधी आदी महत्त्वाचे लाभ देण्यास बराच उशीर होताे. त्यामुळे अनेकवेळा चकरा माराव्या लागतात. आता मात्र सीईओंच्या आदेशानंतर किमान कर्मचाऱ्यांच्या चकरा कमी होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद