शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा नकाराधिकार गोठवला

By admin | Updated: May 15, 2015 01:10 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचे वारे सुरू झाले आहे.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. यात मागील वर्षी आदिवासी भाग म्हणून मिळत असलेला बदलीपासूनचा नकाराधिकार यावर्षी मिळणार नाही. शासनातर्फे उपसचिवांनी याबाबतचे स्पष्टीकरण नुकतेच चंद्रपूर जिल्हा परिषदेला पाठविले आहे.या नकाराधिकारामुळे बदल्यांची प्रक्रिया गोठून गेली होती. वास्तविक असा नकाराधिकार शासन निर्णयात नव्हताच. मात्र मुख्यालयानजिकच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून तो दोन वर्षे लागू करायला लावला. यात अनेक कर्मचाऱ्यांची चांदी झाली. मात्र हा अधिकार नसलेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मार्च २०१४ ला विशेष बैठक लावून शासन निर्णयाचा अर्थ समजून सांगितला. मात्र तत्कालिन उपमुख्यकार्यकारी अधिकारी निकम यांनी केलेली प्रक्रिया बरोबर असल्याचा सूर लावला. अन्य प्रमुख कर्मचाऱ्यांनीही ही बाब कशी बरोबर आहे, हे पटवून दिले. यावेळी हा विषय शासन दरबारी मार्गदर्शनासाठी पाठवावा, अशी विनंती संघटनेच्यावतीने करण्यात आली.या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी लक्ष घालून दोन्हीही वर्षी शासनाकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. याबाबत शासनाचे उपसचिव अ.ए. कुळकर्णी यांनी खुलासा केला आहे. नंदूरबार व गडचिरोली जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना बदलीतून मिळणारी सूट ही चंद्रपूर जिल्हाच काय तर राज्यातील अन्य कोणत्याही जिल्ह्याला लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सदर आदेशाने आता सर्व कर्मचाऱ्यांना बदलीचे सारखेच नियम लागू असणार आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)