शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:37 IST

जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत.

ठळक मुद्देशाळा प्रवेशोत्सवाचा नवीन प्रयोग : दुर्गम, आदिवासी भागातील शाळा वगळल्या

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत. मात्र, दुर्गम व आदिवासी भागातील बहुतांश शाळांना वगळण्यात आले आहे.मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा २००९ लागू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणातील गुणात्मक विकासासाठी नाविण्यपूर्ण संकल्पांचा जणू रतिब ओतल्या जात आहे. यातून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर काय परिणाम होत आहे, हा स्वतंत्र मूल्यमापनाचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत काही शिक्षक संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत असतात. शैक्षणिक आस्थेपोटी शासनाकडे विधायक सूचना केल्या जात असतील तर नाक मुरडण्याचे काही कारण नाही. परंत, काही शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रमातून अंग काढून घेण्यासाठी शिक्षक संघटनांचा ढाल म्हणून वापर करतात, असा पालकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदने २०१९-२० या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विशेष लक्ष देण्याचा संकल्प केला. हे ‘३६ अधिकारी ३६ शाळांना देणार भेटी’ या उपक्रमातून दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.जुन्या परंपरेला फाटायापूर्वी पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उरकून घेतल्या जात होता. जि. प. ने नवीन शैक्षणिक सत्रात या परंपरेला फाटा दिला. कोणते अधिकारी कोणत्या शाळांना भेटी देणार अशा ३६ अधिकाऱ्यांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी तयार केली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकाऱ्यांसह वर्ग-१ आणि २ संवर्गातील ३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मुख्याध्यापक देणार १३ प्रकारची माहितीशाळेच्या पहिल्या दिवशी अधिकाºयांनी भेट दिल्यानंतर मुख्याध्यापकांना शाळा प्रवेशोत्सव भेट प्रपत्रात १३ प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. गृहभेटी झाल्या काय, नियोजनाची एसएमसी सभा, गणवेश व पाठपुस्तके विद्यार्थ्यांना दिले काय, वृक्षारोपणाच्या निर्धारित खड्डयांची संख्या किती, आदी माहितीची नोंद करतील.भेटीसाठी निवडलेल्या जिल्ह्यातील ३६ शाळाजि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव, मारडा (मोठा), सिनाडा, ढोरवासा, मांगली, आमडी, नांदगाव पोडे, मालडोंगरी, ब्रह्मपुरी क्रं. ४, मारडा, आनंदवन, लिखितवाडा, भंगाराम तळोधी, धानोरा, पंचाळा, दिघोरी, घाटकुळ, मूल, ताडाळा, मुंळाडा, नलसेनी पेठगाव, व्याहाड खुर्द, सरडपार, मेंढामाल, सिंदेवाही नं. २, चिखलपरसोडी, मेंढामाल, मानली, आंबेनेरी, बोथली, उपरवाही, वनसळी, पिंपळगाव, पालडोह, शेणगाव, खिचल (बू.) आदी गावातील शाळांना संबंधित अधिकारी भेटी देणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद