शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

युवकांना लागली मुक्ताईची ओढ

By admin | Updated: July 28, 2014 23:27 IST

जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे.

खडसंगी : जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे. मुक्ताईच्या प्रेमापोटी दूरवरुन युवक वाटेल ती किंमत मोजून मुक्ताईच्या कुशीत विसावत आहेत.आषाढ महिन्यात पावसाच्या सरींनी वसुंधरेला न्हाहू घातल्यावर तिच्यावर हळुवार हाताने साज चढवून तिला अलंकारीत करण्याचे काम श्रावणवर सोपविले आहे. याच महिन्यात धरती पावसाच्या जलधारा उरात साठवून हिरवा गालिचा परिधान करते. मानवाच्या मनाला भुरळ पाडली जाऊन मानवाचे मन आनंदी करुन ते प्रेमाने न्हाहुन निघते. मशागत करुन पेरणी करत तृप्त झालेली माती जसे नवे अंकुर घेऊन तरतरुन येते. तशीच काहीशी अवस्था मनाचीही या श्रावण महिन्यात झालेली असते आणि मग मन मानत नसल्याने मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद घेण्याच्या तयारीला लागतो.पावसाळा सुरू झाला धबधब्यावर किंवा धरणावर जाण्याचा बेत प्रत्येकाचा असतो. ‘मुक्ता’ईच्या धबधब्यात वातावरण उत्साह वाढविणारे असल्याने निसर्गप्रेमींना सध्या मुक्ताई चांगलीच भुरळ पाडत आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूर- डोमापासून तीन किमी अंतरावर मुक्ताई हा धबधबा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर अनेकांना आकर्षित करीत आहे. ३० ते ४० फूट उंचीवरुन पडणारे पाणी, त्यामुळे हवेत उडणारे पाण्याचे तुषार, हे पाहण्यासाठी पर्यटकांचे जत्थे मुक्ताईकडे येत आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत.मुक्ताईच्या डोंगर कुशीत असलेला आजूबाजूचा परिसर मनाला प्रसन्न करुन टाकते. त्यामुळे मुक्ताईने परिसरातीलच नव्हे तर दूरवरच्या युवकांना भुरळ पाडली आहे. (वार्ताहर)