शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संकरीत गायीचेच दूध प्यावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय होय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो.  मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात देशी गायींची संख्या कमी होत असून संकरित गायी पालनाचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे नागरिकांना संकरित गायीचेच दूध प्यावे लागणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला. यातूनच आता शेती व्यवसाय सहज जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुधाचा व्यवसाय सुरू झाले. पण,  देशी गायी कमी दूध देत असल्याने संकरित गायी पालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.  जि. प. पशूसंर्वधन विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या दुग्ध विकास योजनांची अंमलबजावणी करीत आसल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

ब्रह्मपुरीत म्हशींची संख्या अधिक

- ब्रह्मपुरी तालुका धान उत्पादनात अग्रेसर आहे. या तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार ८ हजार ९६५ म्हैस वर्गीय जनावरांची नोंद झाली. गायवर्गात २८ हजार ३४२ जनावरे आहेत. शासनाच्या योजनेमुळे शेतकरी आता दुग्ध उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून हा तालुका दूध उत्पादनातही प्रगती करत आहे.

सर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यातसर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यात आहे. पशुगणनेनुसार, ७२ हजार ७७५ पशुधनाची नाेंद करण्यात आली आहे. या तालुक्याला ताडोबाचे जंगल लागून आहे. शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाळू जनावरांचे पालन करत आहेत. वनकायद्यामुळे चराईच्या क्षेत्रात घट झाली, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सर्वांत कमी पशुधन बल्लारपूर तालुक्यातn बल्लारपूर तालुक्यात जंगलाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे; परंतु, अन्य तालुक्यांच्या तुलनेत पशुधनाची संख्या आहे.n जि. प. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, गायवर्ग, म्हैस, मेंढी, शेळी असा वर्गातील १९ हजार ५२७ जनावरांची नोंद झाली आहे.  n पोंभूर्णा तालुक्यात म्हैस वर्गीय जनावरांची संख्या कमी आहे. या शिवाय गोंडपिपरी, जिवती तालुक्यातही प्रमाण कमी आहे. 

 

टॅग्स :milkदूधcowगाय