शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, या वर्षीही परिस्थिती तशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने ...

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. मागील तसेच या वर्षीही ती राबविण्यात आली आहे. मात्र मागील वर्षी वर्षभर शाळाच झाली नसल्यामुळे अभ्यासाविना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. दरम्यान, या वर्षीही सोडत काढण्यात आली असून शुक्रवार, ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र कोरोना संकटामुळे हे वर्षही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १९६ शाळांनी यासाठी नोंदणी केली. यामध्ये १ हजार ५७१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या वर्षी जिल्ह्यात ३ हजार ८२ विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला असून, १ हजार ४५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ११ जूनपासून या विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी पुढील २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरटीई पोर्टलवर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक कळविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे.

निवड तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी मागील वर्षीसारखीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्षसुद्धा घरीच जाते की काय? अशी चिंता पालकांना सतावत आहे.

बाॅक्स

आरटीई अंतर्गत शाळांची नोंदणी - १९६

किती अर्ज आले - ३,०८२

किती जणांना प्रवेश - १,४५१

बाॅक्स

मागील वर्ष वाया गेले

कोट

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र कोरोनाने घात केला. वर्षभर शाळाच झाली नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र साधनांचा अभाव असल्यामुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- महेंद्र खोब्रागडे,

चंद्रपूर

-

माझ्या मुलाला मागील वर्षी प्रवेश मिळाला. मात्र शाळा सुरूच झाली नाही. परिणामी, प्रवेश मिळूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याचे पूर्ण वर्ष वाया गेले. आता पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे पुढील वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे.

- संजय बल्की,

चंद्रपूर

------

आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आला असला तरी काही शाळा संचालक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध स्वरूपात पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात. तक्रार केली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे शिक्षण विभागाने अशा शाळांवर नजर ठेवायला हवी. जेणेकरून गरिबांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

- एक पालक,

चंद्रपूर

बाॅक्स

गरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

मागील वर्षभरापासून प्राथमिकचे विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. या वर्षीही शाळा सुरू होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, लॅपटॉप अशी साधने पुरवावीत, जेणेकरून त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाइन अभ्यास करणे शक्य होईल. यासंदर्भात राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश चहारे यांनी सांगितले.

कोट

ज्या बालकांना लाॅटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायाचित्र घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. पालकांनी शाळांमध्ये गर्दी करू नये. कोरोना संकटामुळे शासन निर्देशानुसारच पुढील सत्र सुरू होईल.

- दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी प्राथमिक