शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, या वर्षीही परिस्थिती तशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने ...

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. मागील तसेच या वर्षीही ती राबविण्यात आली आहे. मात्र मागील वर्षी वर्षभर शाळाच झाली नसल्यामुळे अभ्यासाविना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. दरम्यान, या वर्षीही सोडत काढण्यात आली असून शुक्रवार, ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र कोरोना संकटामुळे हे वर्षही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १९६ शाळांनी यासाठी नोंदणी केली. यामध्ये १ हजार ५७१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या वर्षी जिल्ह्यात ३ हजार ८२ विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला असून, १ हजार ४५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ११ जूनपासून या विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी पुढील २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरटीई पोर्टलवर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक कळविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे.

निवड तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी मागील वर्षीसारखीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्षसुद्धा घरीच जाते की काय? अशी चिंता पालकांना सतावत आहे.

बाॅक्स

आरटीई अंतर्गत शाळांची नोंदणी - १९६

किती अर्ज आले - ३,०८२

किती जणांना प्रवेश - १,४५१

बाॅक्स

मागील वर्ष वाया गेले

कोट

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र कोरोनाने घात केला. वर्षभर शाळाच झाली नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र साधनांचा अभाव असल्यामुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- महेंद्र खोब्रागडे,

चंद्रपूर

-

माझ्या मुलाला मागील वर्षी प्रवेश मिळाला. मात्र शाळा सुरूच झाली नाही. परिणामी, प्रवेश मिळूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याचे पूर्ण वर्ष वाया गेले. आता पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे पुढील वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे.

- संजय बल्की,

चंद्रपूर

------

आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आला असला तरी काही शाळा संचालक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध स्वरूपात पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात. तक्रार केली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे शिक्षण विभागाने अशा शाळांवर नजर ठेवायला हवी. जेणेकरून गरिबांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

- एक पालक,

चंद्रपूर

बाॅक्स

गरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

मागील वर्षभरापासून प्राथमिकचे विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. या वर्षीही शाळा सुरू होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, लॅपटॉप अशी साधने पुरवावीत, जेणेकरून त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाइन अभ्यास करणे शक्य होईल. यासंदर्भात राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश चहारे यांनी सांगितले.

कोट

ज्या बालकांना लाॅटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायाचित्र घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. पालकांनी शाळांमध्ये गर्दी करू नये. कोरोना संकटामुळे शासन निर्देशानुसारच पुढील सत्र सुरू होईल.

- दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी प्राथमिक