शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताच्या दरात यावर्षी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:44 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही ठिकाणी धुळपेरणीही झाली आहे. तर काही ठिकाणी हंगामपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही ठिकाणी धुळपेरणीही झाली आहे. तर काही ठिकाणी हंगामपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. रबीच्या हंगामातही फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयातून नाराजी व्यक्त होत आहे. शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी शेणखताचा उपयोग करतात. मात्र यंदा शेणखताच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या वर्षी एक ट्रॅक्टर शेणखतासाठी शेतकºयांना अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. परंतु यावर्षी शेणखताचे दर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. दिवसेंदिवस शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय कमी आहे. ज्याच्याकडे जनावरे आहेत ते शेतकरी शेणखत टाकत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे काही शेतकरी आपले पशुधन विक्री करीत आहेत. परिणामी पशुधन संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखताच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहे. तर मशागतीसाठी शेणखतही शेतात टाकण्याचे काम जोरास सुरु आहे.सेंद्रीय खतांचे हे आहेत फायदेसेंद्रीय खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो. रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखतामधून अन्नद्रव्यांच प्रमाण अत्यल्प असते, परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होतो. जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाºया संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.शेती साहित्य निर्मितीची लगबगजिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कारागीर शेतीपयोगी साहित्य करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे जिल्हाभरात खरीप हंगामपूर्व शेती मशागतीच्या कामात गती आली आहे. शिवाय अनेक शेतकरी शेतीपयोगी साहित्य तयार करण्यासाठी कारागिरांच्या घरी जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेतीची अनेक कामे पूर्ण होत असली तरी ग्रामीण भागात परंपरागत शेती अवजारांचा वापर शेतीसाठी करण्यात येतो. लोखंडाला आकार देवून त्यापासून शेतीपयोगी साहित्य बनविण्याच्या कामाला लोहार समाजाचे कारागिर लागले आहेत. तसेच काही कारागिर नांगर, वखर व इतर लाकडी साहित्य बनवित आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची दरवाढपशुधन संख्या जास्त असली तरीही यंदा पाणी चारा टंचाईमुळे अनेक पशुपालक आपले पशुधन विक्री करीत आहेत. त्यामुळे पशुधनाची संख्या कमी होत आहे. परिणामी शेणखताच्या दरात वाढ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती