शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात भरारी

By admin | Updated: May 29, 2015 01:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना यावर्षी बारावीच्या निकालात चांगलीच भरारी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक तालुक्याच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना यावर्षी बारावीच्या निकालात चांगलीच भरारी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक तालुक्याच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे यावर्षी महाविद्यालयात प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. हिंदी सिटी कनिष्ठ महाविद्यालयचंद्रपूर : चांदा शिक्षण मंडळाद्वारे संचालित स्थानिक हिंदी सिटी कनिष्ठ महाविद्यालयाने ८२.७६ टक्के निकाल दिला आहे.नागपूर बोर्ड नागपूरद्वारा आयोजित एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी २०१५ मध्ये हिंदी माध्यम कला शाखेत जिल्ह्यात उत्कृष्ठ निकाल दिला असून महाविद्यालयातून एकूण ५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सदर निकाल ८२.७६ टक्के लागला आहे. अर्जून दिलीप शुक्ला याने ७८.६१ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला तर अंकिता अनिलकुमार यादव हिने ७५.३८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला. नागभीडच्या विद्यालयांनी दिला उत्कृष्ट निकालनागभीड : बारावीच्या परीक्षेत येथील तिन्ही विद्यालयांनी निकालाची चांगली टक्केवारी दिली आहे. या निकालाने पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.येथे जनता विद्यालय, जनता कन्या विद्यालय आणि कर्मवीर विद्यालय असे तीन उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यावर्षी या तिन्ही विद्यालयांनी निकालात चांगली भरारी घेतली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार येथील कर्मविर विद्यालयाने ९७.७१ टक्के निकाल दिला. या विद्यालयाचे १३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२८ विद्यार्थी पास झाले. येथील जनता कन्या विद्यालयाने ९७.१४ टक्के निकाल दिला. या विद्यालयातून १०५ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १०२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर जनता विद्यालयाने ९३.६८ टक्के निकाल दिला. या विद्यालयाचे २८५ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जनता कनिष्ठ महाविद्यालयचंद्रपूर : जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के, वाणिज्य विभाग शाखेचा निकाल ९१.९७ टक्के व कला शाखेचा ९१.३४ टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा संभव ए. जैन हा विद्यार्थी ९२.३० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आलेला आहे. व नितिन देवतळे हा विद्यार्थी ९१.२३ टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये अक्षता टाके, शुभम तितरे, सुखदा बोझावार, हरीश खोब्रागडे, मोसम उगेमुगे, सुरव भोयर, प्रिया कासोटे, साक्षी अग्रवाल, राधा पाचपोर, सिमरन कानकाटे, साक्षीकुमार अप्पा, सदाप मो. साजिद, गौरव साखरकर यांचा समावेश आहे.वाणिज्य शाखेचा रोहन राजेश दलिया हा विद्यार्थी ८९.२३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम आलेला आहे. तर द्वितीय प्रगती संतोष तरू ही विद्यार्थिनी ८४.४६ टक्के गुण घेऊन आलेली आहे. ८० टक्केहून अधिक गुण घेणाऱ्यामध्ये ०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कला शाखेमधून निखिता विरेंद्र देशभारतकर ही विद्यार्थिनी ७६.७६ टक्के गुण घेऊन प्रथम आलेली आहे. व दर्शना गौतम साळवे व आकांक्षा निरसन रामटेके यांनी ७१.२३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेली आहे. विद्या निकेतन उर्जानगरचंद्रपूर : निकालामध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यात विद्यानिकेतन उर्जानगरच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षेत सुयश मिळविले. यावर्षी विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकाल देऊन शाळेचे नाव उंचाविले आहे.कुमार सुरज पोहेकरने प्रथम स्थान, कुमार राजहंस जुल्मे द्वितीय स्थान तर कुमारी मोनाली माहुलकर हिने तृतीय स्थापन प्राप्त केले. विषयानुसार प्राविण्य घेण्यात विद्यार्थी मागे राहिले नाही. मोनाली माहुलकर हिने इंग्रजी, हिंदी व जीवशास्त्र या विषयात प्राविण्य प्राप्त केले तर कुमार सुरज पोहेकर याने गणित व भौतिकशास्त्रात प्राविण्य प्राप्त केले. (लोकमत चमू)ब्रह्मपुरी तालुक्याचा निकाल ९०.२५ टक्केब्रह्मपुरी तालुक्याचा निकाल ९०.२५ टक्के लागला आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ही विद्यार्थ्यांनी ९४.९२ टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यात २०९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ८८८ उत्तीर्ण झाले आहेत. ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेजमधून विक्रम उमाजी हिरे याला ९१.२३ टक्के तर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील नेहाल बी. भांबोरे याला ८९.२३ टक्के गुण प्राप्त झाले आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ९४.९२ टक्के, दिपयान कुंतल विश्वास ९२.९२ टक्के तर अभिजीत विकास बनपूरकर याने ८९.२३ टक्के प्राप्त केले आहे. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेज १०० टक्के, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ९२.७०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ८७.३६, लोकमान्य टिळक ९७.८७ टक्के, नेवजाबाई हितकारिणी बॉइज ९३.६५, कृषक कनिष्ठ महा. चौगान ९०.६६, ज्ञानोपासक ज्यु. कॉलेज निलज ९०.११, लोक ज्यु. कॉलेज गांगलवाडी ९०.९१, डॉ. पंजाबराव देशमुख ज्यु. कॉलेज ४९.०६, महाराष्ट्र ज्यु. कॉलेज पिंपळगाव ६९.७७, महात्मा फुले ज्यु. मेंडकी ९३.४४, कर्मविर कनिष्ठ मुडझा ९४.२०, कर्मवीर कन्नमवार सुरबोडी ८४.६२, विकास उच्च माध्य. विद्यालय अऱ्हेरनवरगाव ६५.७१, अनुदानित उच्च महाविद्यालय आश्रमशाळा ८९.१९ टक्के याप्रमाणे आहे. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी. शाखेचा निकाल ९१ टक्के आहे.तालुक्यात प्रथम येऊन नेहाने दिली गुरूदक्षिणाब्रह्मपुरी : शिक्षणाविषयी मनापासून आवड असली की शिक्षणाचे दारेही आपसुकच उघडतात. याचा प्रत्यय ब्रह्मपुरीत आला आहे. घरची हलाखीची परिस्थिती. शैक्षणिक साहित्य घेतानाही विचार यायचा. पैसे नसल्याने बारावी शिकता येईल की नाही, हाही प्रश्नच होता. अखेर शिक्षकांनीच मिळून तिच्या शिक्षणाचा भार उचलला. बुधवारी लागलेल्या बारावीच्या निकालात या मुलीनेही तालुक्यात प्रथम येत आपल्या गुरुजणांना गुरुदक्षिणा दिली. नेहा सुभाष सिंग असे या मुलीचे नाव असून ती ९४.९२ टक्के घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. नेहाचे वडील सुभाष सिंग गौरव पेपर मिलमध्ये मजुरीचे काम करतात. अल्पशा मजुरीवर कुटुंबाचे उदरनिर्वाह करून मुलीला चांगल्या ख्रिस्तानंद शाळेत टाकले. मात्र शिकविणे कठीण जात होते. मात्र नेहाची शिक्षणाविषयीची जिद्द व हुशारी कायम होती. आई गृहिणी आहे. जे मिळेल त्यावर समाधान मानून मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष देणे हेच आईचे कर्तव्य. जेव्हा नेहाने आर्थिक अडचण जाणवली, तेव्हा ख्रिस्तानंदच्या अ‍ॅलीस नामक शिक्षिकेने मदत करून धिर दिला. इतर शिक्षकांनीही परीक्षेचे शुल्क, साहित्य घेण्यास मदत केली. कुठलीही ट्युशन नाही. केवळ शाळेत शिकविल्या जाणाऱ्या तासामधून नेहाने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकविला.