शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:07 IST

आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.

ठळक मुद्देनियोजन भवनात आढावा बैठक : जिल्ह्यात ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १० लाख ९१ हजार हेक्टर असून यातील ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत आहे. ८९ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड होते. उन्हाळ्यात २ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्या विविध पिके घेतली जातात. १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सन २०१८- १९ च्या प्रत्यक्ष साध्य लक्ष्यांकाची माहिती सादर केली. भात, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन क्षेत्र आणि हेक्टरी उत्पादनासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक भोसले उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात बियाण्याची उपलब्धता, बियाणांची मागणी आणि वाटपाची स्थिती कशी आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. पीकविमा, कर्जवाटप, मृदा आरोग्य पत्रिका, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक उषा डोंगरवार, कृषी शास्त्रज्ञ, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.महाबीजने उत्तम बियाणे पुरवावेकमी कालावधीत काढणीला येणाऱ्या व जास्त उत्पादन देणाºया भाताच्या वाणांची जागृती करणे, गुलाबी बोंड अळी रोखण्याच्या उद्देशाने कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांनी उशिरा लावावे. बियाणाचा पुरवठा उशिरा करू नये, बोंडअळी तीन वर्षे कोशातच राहत असल्याने कृषी विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहावे. शेतकºयांना मार्गदर्शन करावे. महाबीजने कमी कालावधीत येणाऱ्या भाताचे वाण उपलब्ध करून देणे, अशा सूचना विभागीय कृषी उपसंचालक भोसले यांनी अधिकाºयांना दिल्या.अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईकमी खर्च आणि अल्प कालावधीतील भात वाणांच्या मागणीत वाढ करावी, शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे, याकरिता व्यवस्थापन कृतीकाळ दर्शवणारी मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार करावे. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच आयोजित केल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाला गैरहजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती