शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:07 IST

आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.

ठळक मुद्देनियोजन भवनात आढावा बैठक : जिल्ह्यात ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १० लाख ९१ हजार हेक्टर असून यातील ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत आहे. ८९ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड होते. उन्हाळ्यात २ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्या विविध पिके घेतली जातात. १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सन २०१८- १९ च्या प्रत्यक्ष साध्य लक्ष्यांकाची माहिती सादर केली. भात, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन क्षेत्र आणि हेक्टरी उत्पादनासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक भोसले उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात बियाण्याची उपलब्धता, बियाणांची मागणी आणि वाटपाची स्थिती कशी आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. पीकविमा, कर्जवाटप, मृदा आरोग्य पत्रिका, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक उषा डोंगरवार, कृषी शास्त्रज्ञ, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.महाबीजने उत्तम बियाणे पुरवावेकमी कालावधीत काढणीला येणाऱ्या व जास्त उत्पादन देणाºया भाताच्या वाणांची जागृती करणे, गुलाबी बोंड अळी रोखण्याच्या उद्देशाने कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांनी उशिरा लावावे. बियाणाचा पुरवठा उशिरा करू नये, बोंडअळी तीन वर्षे कोशातच राहत असल्याने कृषी विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहावे. शेतकºयांना मार्गदर्शन करावे. महाबीजने कमी कालावधीत येणाऱ्या भाताचे वाण उपलब्ध करून देणे, अशा सूचना विभागीय कृषी उपसंचालक भोसले यांनी अधिकाºयांना दिल्या.अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईकमी खर्च आणि अल्प कालावधीतील भात वाणांच्या मागणीत वाढ करावी, शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे, याकरिता व्यवस्थापन कृतीकाळ दर्शवणारी मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार करावे. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच आयोजित केल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाला गैरहजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती