शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा व्यवस्थेविनाच राबताहेत कामगार

By admin | Updated: February 4, 2016 00:54 IST

येथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला.

छतावरून पडून अभियंत्यांचा मृत्यू : आयुध निर्माणी परिसरातील खासगी कंपनीचा प्रतापविनायक येसेकर भद्रावतीयेथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर ‘लोकमत’ने कंपनीत जाऊन पाहणी केली असता कंपनीकडून कामगारांना कोणतीही सुरक्षा दिली जात नसल्याचे दिसून आले.सुनील कांत शेती (२९) रा. बल्लीकुंडा (ओडिशा) असे मृत अभियंत्याचे नाव असून तो गेल्या चार महिन्यापासून एस.एम. या कंपनीमध्ये अभियंता पदावर कार्यरत होता. आयुध निर्माणी परिसरात पिनाका टू या नवीन प्रोजेक्टचे काम जोमाने सुरु असून हे काम डीआरटीओ यांच्या नेतृत्वात हैद्राबाद येथील काही खाजगी कंपन्या काम करीत आहे. श्री बालाजी कंट्रक्शन या कंपनीचे बिल्डींग उभारण्याचे काम असून त्याची देखरेख ठेवण्याचे काम एस.एम. कटेसेन्स कंपनीकडे आहे. घटनेच्या दिवशी पिनाका प्रोजेक्टमधील एच टू या बिल्डींगचे काम चालू असताना सुनील कांत शेती हा काम पाहण्यासाठी ९ मीटरवरील स्लॅब टाकण्यासाठी तयार केलेल्या प्लेटच्या छतावर हेल्मेट, बेल्ट इतर सेफ्टी साहित्य परिधान न करता चढला. चालताना छतावरील प्लेट घसरल्याने तो खाली कोसळला. यात त्याचा मृृृृृत्यू झाला. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कंपनीत जाऊन चौकशी केली असता अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अभियंत्याचा जीव गेल्याची चर्चा होती. हे कामगार सुरक्षा व्यवस्थेविनाच काम करीत असल्याचेही दिसून आले.स्थानिक कामगारांना प्राधान्य नाहीआयुध निर्माणी परिसरात चालू असलेला पिनाका टू हा प्रोजेक्ट खूप मोठा असून यांच्या उभारणीचे काम डीआरडीओ यांनी हैदराबाद येथील दोन खाजगी कंपनीला दिली आहे. याच कामाकरिता मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाची गरज भासत असल्याने कंपनीने स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगार व अभियंत्याचा मोठ्या प्रमाणात भरणा केला आहे. येथील स्थानिकांना रोजगार दिल्यास त्यांना लागणारी सेफ्टी, वेतन व इतर सुविधा जास्त प्रमाणात द्याव्या लागणार, या हेतूने कंपनीने परप्रांतियांचा भरणा करुन कामचलाऊ पध्दतीने काम सुरू ठेवले आहे.कंपनीतील ही तिसरी घटनायेथील कामगार, अभियंता ज्या वेळेस कामावर, साईडवर जातात, त्या वेळी कामगारांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही. यामुळे यापूर्वीसुद्धा दोन घटना घडून एका कामगाराचा पायाला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या कामगाराच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र या कंपनीने घटनेची माहिती बाहेर येऊ दिली नाही. या घटनेमुळे जखमी कामगारांना कामापासून मुकावे लागले. या दोन घटना घडल्यानंतरही कंपनीने सुरक्षा व्यवस्थेबाबत काहीही केले नाही. त्यामुळे मंगळवारी अभियंत्याचा जीव गेला.