शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मिरची सातऱ्याने मिळाले महिला मजुरांच्या हाताला काम

By admin | Updated: February 2, 2015 23:03 IST

विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो.

कान्पा: विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो. परंतु, कानपा येथे मिरची कटाईच्या सातऱ्यामुळे परिसरातील शेकडो महिलांना काम मिळाले आहे. कानपा हे गाव नागपूर-चंद्रपूर मार्गावर असून येथे कोणतेही उद्योग नाही. येथे मिरचीचे तीन सातरे सुरू झाले असून डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या तीन मिरची सातऱ्याने कानपा, बिकली व आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष वर्ग येथे कामासाठी येत आहेत. दररोज तिन्ही मिरचीच्या सातऱ्यात मिळून २०० ते २५० मजूर या कामात आहेत. मिरचीच्या देठ काढून त्याला चांगले बनविणे असे येथे काम असते. या सातऱ्यावर वेगवेगळ्या जातीच्या मिरची आणल्या जातात. प्रत्येक महिला मजुरांना बोऱ्याप्रमाणे भाव मिळत असून एक महिला दिवसाला १०० ते १५० रुपये कमावित आहे. यापूर्वी या परिसरातील महिला भुयार येथील मिरचीच्या सातऱ्यावर काम करण्यासाठी जात होते. परंतु कानपा येथेच सातरा सुरु झाल्याने मजुरांचा वेळ व पैसाही बचत होत आहे. बोहरुन आलेल्या मिरचीचे देठ काढून महिलांकडून चांगली मिरची तयार केली जाते. सदर मिरचीच्या सातऱ्यावर डिसेंबर ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत काम सुरू असतो. या कालावधीत महिलांना शेतीवर काम नसल्याने मिरची कटाईच्या कामाने मजूरीचा प्रश्न मिटला आहे. चांगली मिरची तयार करुन दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठविल्या जात आहे. (वार्ताहर)