शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कापसी कालव्यावरील काम अपूर्णावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:33 IST

Chandrapur : चार गावांतील सिंचन व्यवस्था संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील गावाशेजारून गुरे-ढोरे व लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दोनशे मीटर लांबीचा बोगदा (सुरक्षा कवच) निर्माण करण्याचे काम कापसी गावाशेजारी मे महिन्यापासून सुरू आहे. ते काम कासवगतीने सुरू असून अपूर्णावस्थेत असल्याने त्या कालव्यातून पाणी पुढे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या चार गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहणार आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील क्षेत्रात शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेले लहान-मोठे कालव्यांचे जाळे संपूर्ण सावली तालुक्यात पसरले आहे. अनेक कालवे गावाशेजारून नागरिक व गुरे - ढोरे ये-जा करण्याच्या मार्गावरून गेले आहेत. मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने आणि कालव्यांचा आतील भाग सिमेंट काँक्रिटचा बनविण्यात आल्याने पाळीव आणि जंगली प्राण्यांना कालवा ओलांडून पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत असे. पावसाच्या वेळी तर अनेक जनावरे कालव्यांत फसण्याची भीती निर्माण झाली होती. तर गावाशेजारून गेलेल्या कालव्यामुळे गावातील लहान मुले आणि गावातील गुराढोरांना कालव्यात पडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने अशा कालव्यांवर गावाशेजारी कमीतकमी दोनशे मीटरचे सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी एका कंपनीकडे काम सोपविले. परंतु ती कंपनी हे काम कासवगतीने करीत असल्याने ते काम अपूर्ण असून कालव्यावर लावण्यात आलेले लोखंडी सळाखे मोकळी आहेत.

कालव्याचे पाणी पुढे जाण्यास अडचणया कालव्याच्या पुढे जाणारे पाणी, पाण्याच्या प्रवाहाने येणारा कचरा या ठिकाणी साचणार असल्याने कालव्याचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. परिणामी या कालव्यावरील येणाऱ्या उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण कामामुळे गावातील नागरिक, लहान मुले, जनावरांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर