शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कापसी कालव्यावरील काम अपूर्णावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:33 IST

Chandrapur : चार गावांतील सिंचन व्यवस्था संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील गावाशेजारून गुरे-ढोरे व लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दोनशे मीटर लांबीचा बोगदा (सुरक्षा कवच) निर्माण करण्याचे काम कापसी गावाशेजारी मे महिन्यापासून सुरू आहे. ते काम कासवगतीने सुरू असून अपूर्णावस्थेत असल्याने त्या कालव्यातून पाणी पुढे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या चार गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहणार आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील क्षेत्रात शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेले लहान-मोठे कालव्यांचे जाळे संपूर्ण सावली तालुक्यात पसरले आहे. अनेक कालवे गावाशेजारून नागरिक व गुरे - ढोरे ये-जा करण्याच्या मार्गावरून गेले आहेत. मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने आणि कालव्यांचा आतील भाग सिमेंट काँक्रिटचा बनविण्यात आल्याने पाळीव आणि जंगली प्राण्यांना कालवा ओलांडून पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत असे. पावसाच्या वेळी तर अनेक जनावरे कालव्यांत फसण्याची भीती निर्माण झाली होती. तर गावाशेजारून गेलेल्या कालव्यामुळे गावातील लहान मुले आणि गावातील गुराढोरांना कालव्यात पडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने अशा कालव्यांवर गावाशेजारी कमीतकमी दोनशे मीटरचे सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी एका कंपनीकडे काम सोपविले. परंतु ती कंपनी हे काम कासवगतीने करीत असल्याने ते काम अपूर्ण असून कालव्यावर लावण्यात आलेले लोखंडी सळाखे मोकळी आहेत.

कालव्याचे पाणी पुढे जाण्यास अडचणया कालव्याच्या पुढे जाणारे पाणी, पाण्याच्या प्रवाहाने येणारा कचरा या ठिकाणी साचणार असल्याने कालव्याचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. परिणामी या कालव्यावरील येणाऱ्या उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण कामामुळे गावातील नागरिक, लहान मुले, जनावरांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर