शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम निधीअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे.

ठळक मुद्देमंजुरीला चार वर्षे पूर्ण : चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांची रेल्वे फाटकावर ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या रहदारीसाठी बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करणे गरजेचे होते. बांधकामाला चार वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली. मात्र, निधीअभावी बांधकाम रखडल्याने दररोज शेकडो नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळ राहावे लागत आहे.शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे. २०१६ रोजी या पुलाला ३२.२२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. राज्य शासन, रेल्वे आणि महानगर पालिका मिळून ३३.२२ कोटी रुपयांच्या खर्चाची विभागणी करण्यात आली. बांधकाम सुरु झाले. मात्र, पुलाच्या बांधकामात ९३ पक्की बांधकामे आडवी आली. परिणामी, पुनर्वसनाच्या प्रश्नावरून नागरिकांनी लढा उभारला. काही जण न्यायालयात गेले. त्यामुळे पुलाचे बांधकामाला विलंब होत आहे.१० कोटी २६ कोटींची गरजबाबूपेठ उड्डाणपूल बांधकामासाठी राज्य राज्याकडून १० कोटी २६ लाख आणि मनपाचे पाच कोटी असे एकूण १० कोटी २६ लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे बांधकाम थंडावले आहे. या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली. परंतु राज्य शासनाने निधी दिला नाही. कोरोनामुळे बांधकामावर ३० टक्के निखी खर्च करण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले. त्यामुळे या उड्डाण पुलासाठी निधी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. पुलाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. या प्रश्नावरून राजकारणही झाल्याचा इतिहास आहे.

टॅग्स :railwayरेल्वे