शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

तीव्र उन्हात क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:35 IST

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन...

परीक्षा काळातच स्पर्धा : शिक्षक संघटनांकडून रोषचंद्रपूर : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन माहे डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये केले जाते. मात्र यावर्षी चक्क परीक्षा काळात म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहानपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सुचले आहे. या स्पर्धांबाबत शिक्षक संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवासाठी लागणारा खर्च हा जिल्हा परिषदेच्या फंडामधून केला जातो. चालु सत्रात बिटस्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजनही पार पडले. साधारणत: दरवर्षी जानेवारी महिन्यामध्येच जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्या जात होते. मात्र यावर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या स्पर्धेचा विसर पडला आणि आता उशीरा शहानपण सुचल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ६ मार्चला एक परिपत्रक काढून खेळाडू विद्यार्थ्यांच्या याद्या मागविल्या आहेत. यावरुन मार्च महिन्याच्या कडक उन्हात स्पर्धा घेण्याचा जि.प. शिक्षण विभागाचा मानस दिसून येते. जिल्ह्यातील उन्हाची तिव्रता लक्षात घेता, जिल्हा परिषदेने १० मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळपाळीत सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत दिवसभर मैदानी स्पर्धा घेतल्यास उन्हाच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे यांनी शिक्षणधिकारी (प्राथ.) राम गारकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नये, असे निवेदनातून म्हटले आहे. आयोजित स्पर्धा रद्द करण्याची मागणी म.रा.प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार, सुभाष बेडर, कुंटावार, अशोक टिपले, संजय बट्टे, विठ्ठल आवारी, चांभारे, मारोती जिल्हेवार, तामदेव कावळे, मारोती आनंदे, विष्णू बढे, नारायण तेल्कापल्लीवार, बारसागडे आदींनी केली आहे.