शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

तीव्र उन्हात क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:35 IST

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन...

परीक्षा काळातच स्पर्धा : शिक्षक संघटनांकडून रोषचंद्रपूर : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन माहे डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये केले जाते. मात्र यावर्षी चक्क परीक्षा काळात म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहानपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सुचले आहे. या स्पर्धांबाबत शिक्षक संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवासाठी लागणारा खर्च हा जिल्हा परिषदेच्या फंडामधून केला जातो. चालु सत्रात बिटस्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजनही पार पडले. साधारणत: दरवर्षी जानेवारी महिन्यामध्येच जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्या जात होते. मात्र यावर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या स्पर्धेचा विसर पडला आणि आता उशीरा शहानपण सुचल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ६ मार्चला एक परिपत्रक काढून खेळाडू विद्यार्थ्यांच्या याद्या मागविल्या आहेत. यावरुन मार्च महिन्याच्या कडक उन्हात स्पर्धा घेण्याचा जि.प. शिक्षण विभागाचा मानस दिसून येते. जिल्ह्यातील उन्हाची तिव्रता लक्षात घेता, जिल्हा परिषदेने १० मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळपाळीत सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत दिवसभर मैदानी स्पर्धा घेतल्यास उन्हाच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे यांनी शिक्षणधिकारी (प्राथ.) राम गारकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नये, असे निवेदनातून म्हटले आहे. आयोजित स्पर्धा रद्द करण्याची मागणी म.रा.प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार, सुभाष बेडर, कुंटावार, अशोक टिपले, संजय बट्टे, विठ्ठल आवारी, चांभारे, मारोती जिल्हेवार, तामदेव कावळे, मारोती आनंदे, विष्णू बढे, नारायण तेल्कापल्लीवार, बारसागडे आदींनी केली आहे.