शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पाण्यासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:13 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकेवाडा पेठ येथे भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.दरम्यान, या गावातील महिलांनी गावातील समस्या जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्यापुढे मांडल्या असता बुटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. मासळ-मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात केवाडा गाव येत असून येथील गोड पाण्याची विहीर आटली आहे. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पैसे भरले. मात्र पंचायत समितीने प्रशासनाने याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अखेर गावातील संतापलेल्या महिला एकत्रित आल्या. जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारून उपाययोजनेची मागणी केली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समिती