शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

देऊळवाडा गावात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST

भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे

चारगाव (खदान) : भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील पाण्याचे मुख्य स्रोत बंद पडल्याने अनेक नागरिक गाव सोडून जाण्याच्या विचारात आहेत. गावात दोन वर्षांपासून पाणीटंचाई प्रश्न बिकट होत असल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेऊन वेकोलिने काही दिवसापूर्वी बंद पडलेल्या हातपंपाजवळच दुसरा हातपंप खोदून दिला. मात्र त्याला पाणी लागले नाही. गावातील सर्व विहिरी आटल्याने विहीरी गावात नसल्याची स्थिती आहे. गावात दोन हातपंप असले तरी एका हातपंपाचे पाणी थोड्या-थोड्या अंतराने काढावे लागते. गावाची लोकसंख्या हजारच्या आसपास असून गावात दुसरे पाण्याचे स्रोत नाही. येथील पाणीटंचाई पाहता जिल्हा परिषदेतर्फे एक हातपंप मंजूर झाला. हातपंप कुठे खोदायचा, याची पाहणी पाणी सर्वेक्षण अधिकारी यांनी केली व स्थळ दर्शक नकाशा ग्रामपंचायतीला दिला. मात्र २१ मार्चला हातपंप खोदण्यासाठी मशीन गावात आली त्यावेळी पाणी पुरवठा अधिकारी चंद्रागडे यांनी राजकीय दबावापोटी ‘माझ्या म्हणण्याप्रमाणे हातपंप खोदलात तर ठीक नाही तर मशीन परत पाठवितो’ अशी दबावात्मक भाषा वापरून हातपंप दुसरीकडे खोदण्यास सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या हातपंपाच्या अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर नवीन हातपंप खोदण्यास सुरूवात केली. ८० फुटापर्यंत हातपंप खोदण्यात आले. मात्र जमिनीत खोल खड्डा पडून बाहेर निघणारे पाणी जमिनीत जाऊन हातपंप अयशस्वी ठरला. त्यामुळे जवळच सुरू असलेला दुसरा हातपंपसुद्धा बंद पडला. ठरलेल्या ठिकाणी हातपंप न खोदता अचानक एकमेकाला लागून दुसरा हातपंप का खोदण्यात आला, याबाबत सरपंच व गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आणखी बिकट होत असून यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यावर कारवाई करा४हातपंप खोदण्यासाठी पाणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांने जागा निश्चित करून दिलेली असतानाही पाणी पुरवठा अधिकाऱ्याने मनमानी करून दुसऱ्या जागी हातपंप खोदायला लावले. त्यामुळे सुरू असलेले दुसरे हातपंपही बंद पडले. त्यामुळे पाणी समस्या आणखी तीव्र झाली असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच वनिता बल्की, उपसरपंच मंगेश झाडे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ आस्वले, रंजना आत्राम, संगीता बावणे यांनी केली आहे.