शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देऊळवाडा गावात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST

भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे

चारगाव (खदान) : भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील पाण्याचे मुख्य स्रोत बंद पडल्याने अनेक नागरिक गाव सोडून जाण्याच्या विचारात आहेत. गावात दोन वर्षांपासून पाणीटंचाई प्रश्न बिकट होत असल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेऊन वेकोलिने काही दिवसापूर्वी बंद पडलेल्या हातपंपाजवळच दुसरा हातपंप खोदून दिला. मात्र त्याला पाणी लागले नाही. गावातील सर्व विहिरी आटल्याने विहीरी गावात नसल्याची स्थिती आहे. गावात दोन हातपंप असले तरी एका हातपंपाचे पाणी थोड्या-थोड्या अंतराने काढावे लागते. गावाची लोकसंख्या हजारच्या आसपास असून गावात दुसरे पाण्याचे स्रोत नाही. येथील पाणीटंचाई पाहता जिल्हा परिषदेतर्फे एक हातपंप मंजूर झाला. हातपंप कुठे खोदायचा, याची पाहणी पाणी सर्वेक्षण अधिकारी यांनी केली व स्थळ दर्शक नकाशा ग्रामपंचायतीला दिला. मात्र २१ मार्चला हातपंप खोदण्यासाठी मशीन गावात आली त्यावेळी पाणी पुरवठा अधिकारी चंद्रागडे यांनी राजकीय दबावापोटी ‘माझ्या म्हणण्याप्रमाणे हातपंप खोदलात तर ठीक नाही तर मशीन परत पाठवितो’ अशी दबावात्मक भाषा वापरून हातपंप दुसरीकडे खोदण्यास सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या हातपंपाच्या अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर नवीन हातपंप खोदण्यास सुरूवात केली. ८० फुटापर्यंत हातपंप खोदण्यात आले. मात्र जमिनीत खोल खड्डा पडून बाहेर निघणारे पाणी जमिनीत जाऊन हातपंप अयशस्वी ठरला. त्यामुळे जवळच सुरू असलेला दुसरा हातपंपसुद्धा बंद पडला. ठरलेल्या ठिकाणी हातपंप न खोदता अचानक एकमेकाला लागून दुसरा हातपंप का खोदण्यात आला, याबाबत सरपंच व गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आणखी बिकट होत असून यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यावर कारवाई करा४हातपंप खोदण्यासाठी पाणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांने जागा निश्चित करून दिलेली असतानाही पाणी पुरवठा अधिकाऱ्याने मनमानी करून दुसऱ्या जागी हातपंप खोदायला लावले. त्यामुळे सुरू असलेले दुसरे हातपंपही बंद पडले. त्यामुळे पाणी समस्या आणखी तीव्र झाली असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच वनिता बल्की, उपसरपंच मंगेश झाडे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ आस्वले, रंजना आत्राम, संगीता बावणे यांनी केली आहे.