शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

देऊळवाडा गावात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST

भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे

चारगाव (खदान) : भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील पाण्याचे मुख्य स्रोत बंद पडल्याने अनेक नागरिक गाव सोडून जाण्याच्या विचारात आहेत. गावात दोन वर्षांपासून पाणीटंचाई प्रश्न बिकट होत असल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेऊन वेकोलिने काही दिवसापूर्वी बंद पडलेल्या हातपंपाजवळच दुसरा हातपंप खोदून दिला. मात्र त्याला पाणी लागले नाही. गावातील सर्व विहिरी आटल्याने विहीरी गावात नसल्याची स्थिती आहे. गावात दोन हातपंप असले तरी एका हातपंपाचे पाणी थोड्या-थोड्या अंतराने काढावे लागते. गावाची लोकसंख्या हजारच्या आसपास असून गावात दुसरे पाण्याचे स्रोत नाही. येथील पाणीटंचाई पाहता जिल्हा परिषदेतर्फे एक हातपंप मंजूर झाला. हातपंप कुठे खोदायचा, याची पाहणी पाणी सर्वेक्षण अधिकारी यांनी केली व स्थळ दर्शक नकाशा ग्रामपंचायतीला दिला. मात्र २१ मार्चला हातपंप खोदण्यासाठी मशीन गावात आली त्यावेळी पाणी पुरवठा अधिकारी चंद्रागडे यांनी राजकीय दबावापोटी ‘माझ्या म्हणण्याप्रमाणे हातपंप खोदलात तर ठीक नाही तर मशीन परत पाठवितो’ अशी दबावात्मक भाषा वापरून हातपंप दुसरीकडे खोदण्यास सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या हातपंपाच्या अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर नवीन हातपंप खोदण्यास सुरूवात केली. ८० फुटापर्यंत हातपंप खोदण्यात आले. मात्र जमिनीत खोल खड्डा पडून बाहेर निघणारे पाणी जमिनीत जाऊन हातपंप अयशस्वी ठरला. त्यामुळे जवळच सुरू असलेला दुसरा हातपंपसुद्धा बंद पडला. ठरलेल्या ठिकाणी हातपंप न खोदता अचानक एकमेकाला लागून दुसरा हातपंप का खोदण्यात आला, याबाबत सरपंच व गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आणखी बिकट होत असून यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यावर कारवाई करा४हातपंप खोदण्यासाठी पाणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांने जागा निश्चित करून दिलेली असतानाही पाणी पुरवठा अधिकाऱ्याने मनमानी करून दुसऱ्या जागी हातपंप खोदायला लावले. त्यामुळे सुरू असलेले दुसरे हातपंपही बंद पडले. त्यामुळे पाणी समस्या आणखी तीव्र झाली असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच वनिता बल्की, उपसरपंच मंगेश झाडे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ आस्वले, रंजना आत्राम, संगीता बावणे यांनी केली आहे.