शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

जोडधंद्याशिवाय आर्थिक विकास अशक्य

By admin | Updated: February 2, 2016 01:14 IST

पाणी, पाण्याचा योग्य वापर आणि शेतीला पूरक जोडधंदेच शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देण्यास सहाय्यभूत ठरतील, ..

हंसराज अहीर : जल परिषद व कृषी प्रदर्शनीचा समारोपचंद्रपूर : पाणी, पाण्याचा योग्य वापर आणि शेतीला पूरक जोडधंदेच शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देण्यास सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जिल्हास्तरीय जल व कृषी प्रदर्शनीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आमदार संजय धोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेद्र कल्याणकर, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर व कृषी विकास अधिकारी प्रविण देशमुख यावेळी उपस्थित होते.पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहावे, असे सांगून ना.अहीर म्हणाले, पाणी वापरासंबंधी प्रत्येक गावचा शेतकरी जागृत राहिल्यास पाण्याचा योग्य वापर होईल व सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. ग्रामीण भागात नद्या व नाले वाहून जातात, ही चितेंची बाब असल्याचे नमूद करुन ते म्हणाले, नदी व नाले यावर छोटे छोटे बांध बांधून पाणी अडविणे गरजेचे आहे. गावाला लागून असलेल्या नदीवर बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून आणण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करावा अशा सूचना त्यांनी केल्या.शेतीला पूरक व्यवसाय हाच शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता देवू शकते, असे सांगून ते म्हणाले की, रस्त्या लगतच्या सर्व गावात भाजीपाला उत्पादन मोठया प्रमाणात घेतले पाहिजे. जिल्हयातील दोनशे गावं रस्त्यालगत असून या ठिकाणी हा व्यवसाय उत्तम उपाय होऊ शकतो. याची सुरुवात घोडपेठ येथून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संध्या गुरुनुले म्हणाल्या, आधुनिक पध्दतीची शेती करताना उत्तम तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. असे तंत्रज्ञान या परिषदेमधून शेतकऱ्यांना देण्याचा चांगला उपक्रम घेण्यात आला. गावातील नदी नाल्यांना पूर्नजिवीत करुन पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय होवू शकतो, असे मत आमदार संजय धोटे यांनी केले. या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी प्रशासनाने संवाद कायम ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आत्महत्याचा विचार मनात आल्यास एकदा तरी आम्हाला भेटा तुमच्या समस्या व प्रश्नासंदर्भात घटनेच्या चौकटीत बसून तोडगा काढू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी शेतकऱ्यांना केले. प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी मानले. (प्रतिनिधी)या शेतकऱ्यांना केले पुरस्कृतयावेळी पाहुण्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. उत्कृष्ट शेतकरी गट- महात्मा फुले शेतकरी स्वंयसहाय्यता बचत गट चोरगाव ता.चंद्रपूर, कृषि मित्र पुरुष शेतकरी बचत गट कहाली ता.ब्रम्हपूरी, हरीत क्रांती शेतकरी बचत गट कोरपना, निसर्ग राजा पुरुष शेतकरी गट पिरली ता.भद्रावती, विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी- रंजना शैलेश बांबोळे कोटगाव ता.नागभिड, दिनेश शेंडे मेंढा ता. सिंदेवाही, सुनील दिवशे आष्टा ता.पोंभुर्णा, उत्कृष्ट फळ उत्पादक शेतकरी- मारोती वनकर गडचांदूर, मधुकर भलमे चारगाव ता.वरोरा, देवीदास पडोळे पांडरपौनी ता.राजूरा, उत्कृष्ठ भाजीपाला उत्पादक शेतकरी- देवानंद निरंजने लावारी ता.बल्लारपूर, रत्नाकर पेटकुले बेंबाळ ता.मूल यांना पुरस्कार देण्यात आले.