शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जोडधंद्याशिवाय आर्थिक विकास अशक्य

By admin | Updated: February 2, 2016 01:14 IST

पाणी, पाण्याचा योग्य वापर आणि शेतीला पूरक जोडधंदेच शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देण्यास सहाय्यभूत ठरतील, ..

हंसराज अहीर : जल परिषद व कृषी प्रदर्शनीचा समारोपचंद्रपूर : पाणी, पाण्याचा योग्य वापर आणि शेतीला पूरक जोडधंदेच शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देण्यास सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जिल्हास्तरीय जल व कृषी प्रदर्शनीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आमदार संजय धोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेद्र कल्याणकर, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर व कृषी विकास अधिकारी प्रविण देशमुख यावेळी उपस्थित होते.पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहावे, असे सांगून ना.अहीर म्हणाले, पाणी वापरासंबंधी प्रत्येक गावचा शेतकरी जागृत राहिल्यास पाण्याचा योग्य वापर होईल व सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. ग्रामीण भागात नद्या व नाले वाहून जातात, ही चितेंची बाब असल्याचे नमूद करुन ते म्हणाले, नदी व नाले यावर छोटे छोटे बांध बांधून पाणी अडविणे गरजेचे आहे. गावाला लागून असलेल्या नदीवर बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून आणण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करावा अशा सूचना त्यांनी केल्या.शेतीला पूरक व्यवसाय हाच शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता देवू शकते, असे सांगून ते म्हणाले की, रस्त्या लगतच्या सर्व गावात भाजीपाला उत्पादन मोठया प्रमाणात घेतले पाहिजे. जिल्हयातील दोनशे गावं रस्त्यालगत असून या ठिकाणी हा व्यवसाय उत्तम उपाय होऊ शकतो. याची सुरुवात घोडपेठ येथून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संध्या गुरुनुले म्हणाल्या, आधुनिक पध्दतीची शेती करताना उत्तम तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. असे तंत्रज्ञान या परिषदेमधून शेतकऱ्यांना देण्याचा चांगला उपक्रम घेण्यात आला. गावातील नदी नाल्यांना पूर्नजिवीत करुन पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय होवू शकतो, असे मत आमदार संजय धोटे यांनी केले. या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी प्रशासनाने संवाद कायम ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आत्महत्याचा विचार मनात आल्यास एकदा तरी आम्हाला भेटा तुमच्या समस्या व प्रश्नासंदर्भात घटनेच्या चौकटीत बसून तोडगा काढू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी शेतकऱ्यांना केले. प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी मानले. (प्रतिनिधी)या शेतकऱ्यांना केले पुरस्कृतयावेळी पाहुण्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. उत्कृष्ट शेतकरी गट- महात्मा फुले शेतकरी स्वंयसहाय्यता बचत गट चोरगाव ता.चंद्रपूर, कृषि मित्र पुरुष शेतकरी बचत गट कहाली ता.ब्रम्हपूरी, हरीत क्रांती शेतकरी बचत गट कोरपना, निसर्ग राजा पुरुष शेतकरी गट पिरली ता.भद्रावती, विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी- रंजना शैलेश बांबोळे कोटगाव ता.नागभिड, दिनेश शेंडे मेंढा ता. सिंदेवाही, सुनील दिवशे आष्टा ता.पोंभुर्णा, उत्कृष्ट फळ उत्पादक शेतकरी- मारोती वनकर गडचांदूर, मधुकर भलमे चारगाव ता.वरोरा, देवीदास पडोळे पांडरपौनी ता.राजूरा, उत्कृष्ठ भाजीपाला उत्पादक शेतकरी- देवानंद निरंजने लावारी ता.बल्लारपूर, रत्नाकर पेटकुले बेंबाळ ता.मूल यांना पुरस्कार देण्यात आले.