शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ओबीसी समन्वय समितीवरील गुन्हे मागे घ्या

By chandrapurhyperlocal | Updated: December 10, 2020 15:28 IST

वरोरा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे ...

वरोरा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे ओबीसी समन्वय समितीने संविधान दिनी मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोरोनाचे संकट पुढे करीत पोलिसांनी आयोजन समितीवर गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाची ही कारवाई अन्यायकारक असून समन्वय समितीवरील गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वरोरा येथील ओबीसी बांधवांनी दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधीकारी रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले आहे.

ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. असे असतानाही या समाजाची जनगणना करण्यात येत नाही. त्यामुळे समाजबांधवांना अनेक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देवून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणीसह अन्य मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

शिष्टमंडळात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, वरोरा धणोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष रमेश राजुरकर, श्याम लेंडे, योगीता लांडगे, सुधाकर जिवतोडे, भास्कर नित, सुरेश बुरान, प्रा. काकडे, विठ्ठलराव भेदुरकर, निलकंठ वाढई, अशोक पोफळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

फोटो : एसडीओ रवींद्र शिंदे यांना निवेदन देताना ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, रमेश राजुरकर आदी.