शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जगण्यासाठी केविलवाणा संघर्ष

By admin | Updated: December 6, 2014 01:24 IST

दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला.

प्रकाश काळे गोवरीमै उगाता हू कपासतो सारी दुनिया कपडे पहनती हैफिर भी मेरी ही लाश क्यूएक कफन के लिए तरसती है ?कवितेच्या या ओळी शेतकऱ्यांची व्यथाच नाही तर त्यांच्या जिवनाची दु:खदायक कहानी मांडायला पुरेशा आहेत. दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी कमी पावसात कशीबशी शेती पिकविली. शेतीवर जुळवाजुळव करुन खर्च केला. मात्र झालेला खर्च निघणार किंवा नाही, याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसूनही निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. ‘कृषीप्रधान देशातील उत्तम शेती’ अशी ब्रिदवाक्येही आता काळाच्या ओघात केव्हाच मागे पडली आहेत. शेतकऱ्यांनी अनेक पावसाळे पाहिले. तेव्हा निसर्ग शेतकऱ्यांना लेकराप्रमाणे जवळ करायचा. मात्र कष्टकरी बापालाही निसर्गाने दगा दिल्याने शेतीवर अतोनात खर्च करुन उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवस-रात्रं छळत आहे. यंदा निसर्गाच्या संकटाशी सामना करीत शेतकऱ्यांनी कसेबसे शेतात पीक उभे केले. विदर्भाची सुपिक माती आणि त्या मातीत उगविणारे मोती शेतकऱ्यांना त्यांची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाची अवस्था व सरकारी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा यात शेतकरी भरडला जात असताना शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्यामुळे ‘शंभराचे साठ अन् गळ्याला फास’ अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा किती काळ अंत पाहायचा, असा प्रश्न काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणुकांच्या काळात मतांचा जोगवा मागणारे राजकीय पुढारी आता शेतकऱ्यांविषयी बोलायला तयार नाहीत. मग ते खरोखरच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतील काय? अशी शंकाही आता घेतली जात आहे. केवळ आश्वासनाची खैरात आणि आमिषं दाखवून जनतेला कशी भूल पडेल याचा विचार सत्ताधारी करतात. मात्र जगाचा पोशिंदा गळ्याला फास आवळतोय त्याचे काय? दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याने पिकविलेली हक्काची चतकोर भाकर खाता येत नाही. हा कुठला न्याय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. परंतु शासनाने अद्यापही कापसाला हमी भाव जाहीर केला नाही. एवढेच नव्हे तर शासकीय खरेदीही सुरू झाली नाही.