शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गृह राज्यमंत्र्याचा दौरा सार्थक ठरेल काय ?

By admin | Updated: May 6, 2015 01:26 IST

आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

शंकर चव्हाण जिवतीआंध्र-महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै १९९७ रोजी दिल्यानंतरही खुद्द महाराष्ट्र शासनानेच ‘त्या’ १४ गावांना वाळीत टाकले आहे. परिणामी महाराष्ट्राच्या गाफिलपणाचा फायदा घेत आंध्र प्रदेश तेलंगणा शासन आजही या गावांमध्ये आपले अधिपत्य गाजवित आहे. महाराष्ट्राचा अविभाज्य घटक झालेल्या या गावांची दुर्दशा आजही कायम आहे. येथील नागरिकांचे प्रश्न कायमचे निकाली लावू, असे आश्वासन मागील वर्षी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. मात्र आश्वासन हवेतच विरले. आता राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा महाराजगुडा, परमडोली या वादग्रस्त गावातील लोकांशी सोमवारी संवाद साधला. त्यात अनेक गंभीर प्रश्न समोर आले. विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याचे कबूल केले असले, तरी या वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न कायमचा निकाली काढणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पहाडावरील गावांना दुष्काळाचे चटके बसत आहे. उन्हाची लाही-लाही त्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची प्राणांतिक झुंज थांबलेली नाही. दळण वळणासाठी पक्या रस्त्यांची सोय नाही. आरोग्य यंत्रणा तर पुरती कोलमडलेली आहे. दवाखाना आहे, मात्र कर्मचारी नाही. दूरध्वनीची सेवा नाही, जमीन ताब्यात आहे पण मालकी हक्क नाही, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असतानाही महाराष्ट्र शासनाने ठोस भूमिका घेतली नाही. याचाच फायदा घेत (आंध्र.) तेलंगाना शासनाने विकासात्मक कामे केली. आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, जमिनीचे पट्टे दिले आहेत. दोन्ही राज्याची विकास यंत्रणा या १४ गावात राबत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. भाषाप्रांत रचनेनुसार १९५६ च्या फाजल अली समितीने निर्धारीत केलेल्या आंतरराज्य सीमा रेषेनुसार ही १४ गावे महाराष्ट्र राज्यातीलच आहेत. या सर्व गावात माठी भाषिक नागरीक राहतात. त्याची मातृभाषा मराठीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भटाळी भाषिकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र शासन मात्र विकास कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न तातडीने सोडवा अशी मागणी घेवून शासन प्रशासनाची दारे ठोठावली आहेत. अनेक वेळा विधानसभेत १४ गावांचे प्रश्न गाजले आहे. अनेक मंत्र्यांनी आश्वासने दिली. काहीनी प्रत्यक्ष भेट दिली. मंत्र्यांच्या भेटी झाल्या आता तरी या वादग्रस्त गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिवती तालुक्यातील महाराजगुडा, परमडोली या गावांत केलेला दौरा जनतेसाठी सार्थक ठरेल काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.