शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

रात्री रानडुक्कर, दिवसा वानरांचा त्रास; सोलार कुंपणाने अडविली त्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांना सौम्य झटका बसतो व ते दुसऱ्यांदा त्या परिसरात फिरकत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : दरवर्षी शेतकरी शेतात उत्पन्न घेण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक निघेपर्यंत जिवापाड कष्ट घेतात. महत्त्वाचे म्हणजे रब्बी हंगामात पिकांची वन्यप्राण्यांपासून जास्त काळजी घ्यावी लागते. तरीही शेतकऱ्यांना रात्री रानडुकरांचा त्रास व दिवसा वानरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पाच वर्षांत बल्लारपूर तालुक्यातील १३९२ शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान झाल्याचे अर्ज केले व बल्लारपूर वनखात्याने त्यांना ४ कोटी १० लाख ८ हजार ५६४ रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याची बाब सातत्याने शासनाच्या निदर्शनास येत होती. त्यासाठी रानडुक्कर व रोही या प्राण्यांची पारध करण्याची पद्धती सुलभ करण्याचा निर्णय शासनाने २०१५ रोजी घेतला व या प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने वनपालांकडे केली.बल्लारपूर तालुक्यात आठ हजारांच्या वर शेतकरी आहेत; परंतु रब्बीचे पीक घेणारे शेतकरी फार कमी आहे. पळसगाव, आमडी, इटोली, मानोरा केम, कळमना ही गावे जंगलाला लागून असल्यामुळे रात्री येथील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. शेतकऱ्यांना रात्र शेतात काढावी लागते, तरीसुद्धा रानडुक्कर व अन्य प्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. अलीकडे शेतात वानरांची टोळी शिरून पिकांचे नुकसान करू लागली आहे. अशा वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. या योजनेचा फायदा बल्लारपूर तालुक्यातील २८१ शेतकरी बांधवांना मिळाला आहे. पळसगाव, आमडी, किन्ही, केम या गावांनाही मिळणार आहे. 

सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांना सौम्य झटका बसतो व ते दुसऱ्यांदा त्या परिसरात फिरकत नाहीत. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोलार कुंपण वाटप करण्यात आले असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. -संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह

शेतीचा बहुतांश भाग हा जंगलाने वेढलेला असतो. त्या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. यामुळे रानडुकरांचा कळप नेहमीच धुडघूस घालतो. सोलार कुंपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. -पवन साळवे, शेतकरी, बामणी

 

टॅग्स :forest departmentवनविभागagricultureशेती