शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

रात्री रानडुक्कर, दिवसा वानरांचा त्रास; सोलार कुंपणाने अडविली त्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांना सौम्य झटका बसतो व ते दुसऱ्यांदा त्या परिसरात फिरकत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : दरवर्षी शेतकरी शेतात उत्पन्न घेण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक निघेपर्यंत जिवापाड कष्ट घेतात. महत्त्वाचे म्हणजे रब्बी हंगामात पिकांची वन्यप्राण्यांपासून जास्त काळजी घ्यावी लागते. तरीही शेतकऱ्यांना रात्री रानडुकरांचा त्रास व दिवसा वानरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पाच वर्षांत बल्लारपूर तालुक्यातील १३९२ शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान झाल्याचे अर्ज केले व बल्लारपूर वनखात्याने त्यांना ४ कोटी १० लाख ८ हजार ५६४ रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याची बाब सातत्याने शासनाच्या निदर्शनास येत होती. त्यासाठी रानडुक्कर व रोही या प्राण्यांची पारध करण्याची पद्धती सुलभ करण्याचा निर्णय शासनाने २०१५ रोजी घेतला व या प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने वनपालांकडे केली.बल्लारपूर तालुक्यात आठ हजारांच्या वर शेतकरी आहेत; परंतु रब्बीचे पीक घेणारे शेतकरी फार कमी आहे. पळसगाव, आमडी, इटोली, मानोरा केम, कळमना ही गावे जंगलाला लागून असल्यामुळे रात्री येथील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. शेतकऱ्यांना रात्र शेतात काढावी लागते, तरीसुद्धा रानडुक्कर व अन्य प्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. अलीकडे शेतात वानरांची टोळी शिरून पिकांचे नुकसान करू लागली आहे. अशा वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. या योजनेचा फायदा बल्लारपूर तालुक्यातील २८१ शेतकरी बांधवांना मिळाला आहे. पळसगाव, आमडी, किन्ही, केम या गावांनाही मिळणार आहे. 

सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांना सौम्य झटका बसतो व ते दुसऱ्यांदा त्या परिसरात फिरकत नाहीत. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोलार कुंपण वाटप करण्यात आले असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. -संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह

शेतीचा बहुतांश भाग हा जंगलाने वेढलेला असतो. त्या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. यामुळे रानडुकरांचा कळप नेहमीच धुडघूस घालतो. सोलार कुंपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. -पवन साळवे, शेतकरी, बामणी

 

टॅग्स :forest departmentवनविभागagricultureशेती