शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेमू’ला विसापूरला थांबवायला हरकत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रेल्वे तिकीट घर व गोंदिया गाडीचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर :  मागील तीन महिन्यांपासून बल्लारशाह ते गोंदिया आणि बल्लारशाह ते वर्धा अशी डेमू व मेमू ट्रेन सुरू झाल्याने ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त व हक्काचे प्रवासाचे  साधन मिळाले आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात आजही  बल्लारशाह- गोंदिया डेमू ट्रेन थांबत नाही व वर्धा मेमूचा तांत्रिक थांबा असूनही ट्रेनचे तिकीट मिळत नसल्याने  त्यांना अजूनही चंद्रपूर किंवा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड व गैरसोयींमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रेल्वे थांबा देण्यात यावा, तिकीट घर सुरू करण्यात यावे, तसेच पूर्वी डेमू व मेमू रेल्वेशिवाय जादा पॅसेंजर गाड्या सोडण्यात याव्या, याबाबतचा पाठपुरावा माजी खासदार हंसराज अहिर यांनी करावा, अशी विनंतीपर मागणी भाजपा युवा उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे, रेल्वे तिकीट कंत्राटदार चंद्रशेखर गिरडकर यांनी गावकऱ्यांमार्फत त्यांना केली होती. यापैकी डेमू ट्रेनचा थांबा चांदा फोर्टसमोर प्रत्येक लहान खेड्यातील हॉल्ट स्टेशनवर देण्यात आला आहे. फक्त विसापूरलाच सावत्रपणाची वागणूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रेल्वे तिकीट घर व गोंदिया गाडीचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.

पॅसेंजर गाड्या म्हणजे आवडते प्रवास साधन

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पॅसेंजर गाड्या जीवनवाहिनी आहे. स्वस्त आणि सुलभ प्रवास सुविधेमुळे ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी यातूनच प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन ऐवजी मेमू आणि डेमू गाड्या सुरू केल्या आहेत. डेमू गाडी बल्लारशाह ते गोंदिया आणि मेमू बल्लारशाह ते वर्धा धावत आहेत. यापैकी एक गाडी येथे थांबत नाही तर दुसरीची तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्या सुरू होऊनही त्याचा काहीच फायदा गावकऱ्यांना होत नाही.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरrailwayरेल्वे