शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

अमलनाला धरण परिसरात 15 मृत जनावरे फेकणारे कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  दरम्यान, परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात  तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी एकाच ठिकाणी तब्बल १५ मृत जनावरे आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपासून गोवंश तस्करांच्या आंतरराज्य टोळीने नव्या मार्गाचा वापर सुरू केला. वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  दरम्यान, परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात  तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले. गावातील जनावरांचा अपघाती अथवा नैसर्गिक जनावरांचा मृत्यू झाला तरी अशी अवहेलना कुणीही करीत नाही. जनावरांच्या मृतदेहाची मानवी वस्तीपासून दूर व योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाते. पण एकाच ठिकाणी १५ मृत जनावरे आढळल्याने विविध शंकांना पेव फुटले. जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. धरणाच्या परिसरात मृतदेह फेकणारे काेण, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

गडचांदूरच्या पाणीपुरवठ्याचे काय?  लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. अशावेळी ती मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमलनाला प्रकल्पातून गडचांदूर व नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अशा स्थितीत धरण परिसरात मृत जनावरे टाकणे बंद झाले नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

नागरिक म्हणतात...चौकशी करून कारवाई कराn अमलनाला धरण परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळल्यानंतरही पोलीस, महसूल व पशुसंवर्धन विभागाला काहीही माहिती नाही. त्या जनावरांचा पंचनामा का झाला नाही, असाही प्रश्न पुढे आला. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

यापूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली मृत जनावरे

काही महिन्यांपूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत मृत जनावरे टाकण्यात आली होती. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गो-तस्करांना प्रखर विरोध केला. परिणामी, मृत जनावरे बैलमपूर शिवारात टाकणे सुरू झाले. आता अगदी गडचांदूर शहराला लागूनच असलेल्या अमलनाला धरण परिसरात मृत जनावरे टाकल्याने तस्करांवर कुणाचा वरदहस्त आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. 

 

टॅग्स :amalnala Damअमलनाला धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प