शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

हाताला काम देणाऱ्या उद्योगांची कुणी अडवली वाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:21 IST

उद्योगांची स्थिती बिकट : निवडणूक प्रचारात मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : उद्योग जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख असली तरी बेरोजगारांच्या हाताला काम देणाया उद्योगांना अजूनही बूस्टर मिळाले नाही. स्थिर झालेल्या उद्योगांत काही प्रमाणात रोजगार मिळाला. मात्र, बेरोजगारांचे वाढते तांडे आणि सरकारी अर्थबळाअभावी खालावत चालेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक रोजगाराचा प्रश्न प्रचारात ऐरणीवर येणार काय, याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर हे नागपूरनंतर औद्योगिकदृष्ट्या दुसरे महत्त्वाचे शहर आहे. वेकोलि, सिमेंट कारखाने, वीजप्रकल्प असल्याने त्यावर आधारित छोटे उद्योग सुरू झाले. पण, उद्योगांचा विकास अपेक्षित होऊ होऊ शकला नाही. २७ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीजप्रकल्पाचा प्रश्न सुटलानाही. आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा जवळ असल्याने उद्योजकांची चंद्रपूरला गुंतवणुकीसाठी पसंती मिळते. वेकोलि, सिमेंट कारखाने, वीजप्रकल्प असल्याने त्यावर आधारित छोटे उद्योग सुरू झाले. पण, मागील काही वर्षात उद्योगांचा विकास अपेक्षित होऊ होऊ शकला नाही. रोजगाराच्या आशा मावळल्या. चंद्रपूर एमआयडीसीतील काही उद्योगांचा अपवाद वगळल्यास तालुकास्तरावरील एमआयडीसी नावापुरत्याच राहिल्या आहेत. 

एमआयडीसीत उरले केवळ भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रात अनेकांनी उद्योगांसाठी भूखंड ताब्यात घेतले. मात्र, पायाभूत, सुविधा, बँकांकडून अर्थपुरवठा तसेच कच्चा मालाचा अभाव आणि वाढत्या वीजदराने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला. 

उद्योगांची संख्या घटली एमआयडीसीत काही वर्षापूर्वी उद्योगांची संख्या २५० पेक्षा होती. ती आता ८० वर आली आहे. बंद पडलेल्या उद्योगांना राज्य सरकारने बूस्टर पुरविण्याचे धोरण राबविले नाही. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती खुंटली. कौशल्यप्राप्त सुशिक्षित बेरोजगारांनी सुरु केलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांनाही बळ मिळत नसल्याने शेवटच्या घटका मोजत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केवळ राजकीय चिखलफेक करण्याऐवजी हे ज्वलंत प्रश्न चर्चेत आणले पाहिजे, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.

जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्तही निराश पिपरी, डोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाल तीठ व चिरादेवी या गावातील शेतकऱ्यांची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन १९९४-९५ मध्ये निप्पॉन डेन्ड्रो वीजप्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. भद्रावती शहरापासून ही जागा सात किलोमीटर अंतरावर आहे. कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वे ट्रॅक, वीज साठविण्यासाठी पॉवर ग्रीड, जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, हा प्रकल्प मार्गी लागला नाही. प्रकल्पात जमिनी जाऊनही वाट्याला काहीही आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्येही निराशा आहे. याशिवाय, सहाही विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या उद्योगांचे काय झाले, हाही प्रश्न युवक विचारत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीchandrapur-acचंद्रपूर