शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

काम कुठे अन् कार्यालय कुठे !

By admin | Updated: February 20, 2015 00:51 IST

१५ आॅगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन करून कोरपना हा नवा तालुका अस्तित्वात आला.

कान्हाळगाव (कोरपना) : १५ आॅगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन करून कोरपना हा नवा तालुका अस्तित्वात आला. मात्र तालुका निर्मितीच्या २४ वर्षानंतरही इथल्या प्रशासकिय यंत्रणेला स्थिरता आली नसल्याने नागरिकांना अन्य स्थळी जावून आपली कामे करावी लागत आहेत.येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अभियंता (वीज), तालुका वैद्यकिय अधिकारी, शाखा अभियंता (पकडीगुड्डम धरण प्रकल्प) कार्यालय, तालुका मुख्यालयी असण्याऐवजी नांदा, गडचांदूर व उर्वरित कार्यालये राजुऱ्यातच असल्याने नागरिकांची कामे एका ठिकाणी होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना इकडून तिकडे तिकडून इकडे जाण्यात वेळ जातो. यात मोठा प्रमाणात नागरिकांची परवड होते असुन नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.तालुकाच्या निर्मितीनंतर येथे विविध कार्यालये स्थापन्यात आली त्याचा कारभार सुरू झाला. परंतु या कार्यालयाच्या स्थलांतरणाची बाब शासनाने मनावर न घेतल्याने काम एका ठिकाणी आणि कार्यालय दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)या कार्यालयाची व्हावी निर्मितीकोरपना या तालुका मुख्यालयी उपडाकघर, बस आगार, राष्ट्रीयकृत बँक, उपविभागीय अधिकारी (पाणी पुरवठा), जलसंपदा, पाटबंधारे, वन परिक्षेत्र अधिकारी आदी कार्यालये नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन कामे करावी लागतातया कार्यालयाचे व्हावे स्थलांतरयेथे तालुका मुख्यालय असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अभियंता (वीज), तालुका वैद्यकिय अधिकारी, शाखा अभियंता (पकडीगुड्डम) धरण प्रकल्प कार्यालयाचे स्थलांतर केले जावे.दप्तर दिरंगाई तालुका निर्मिती झाली. मात्र जनतेचे दुर्दैवी भोग संपले नाहीत. येथे प्राथमिक सुविधांचा अभाव आणि मुख्यालयी कार्यालये नाहीत. याच परिणाम विकासावर होत आहे. फाईल्स इकडून तिकडे फिरत असल्याने नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे, क्षेत्राचा विकास अडला गेल्या दहा वर्षांपासून येथील ग्रामस्थामार्फत मंदिराला वनपट्टा देण्यात यावा, अशी मागणी आहे. यासंदर्भात वनसडी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव तयार करून विभागीय वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र कोणतीच कार्यवाही न झाल्याने प्रकरण प्रलंबित आहे. हेच कारण तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आडकाठी ठरत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. कोरपना तालुक्यातील पारडी येथील शिवमंदिर व घाटराई देवस्थानाला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. त्यांना तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.परंतू येथे पायाभूत सुविधा होणे तितकेच गरजेचे आहे.- अनंता गोडे, ग्रामस्थ, पारडीपूर्वीची परिस्थिती आणि आताची मंदिराची परिस्थिती यात बराच बदल झाला आहे. मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे भक्तांची गैरसोय होते. पाहून निश्चित असमाधान वाटते. या परिसराचा त्वरित विकास व्हावा हीच अपेक्षा आहे.-मधुकर पुंडके, पारडी.