शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा तांदूळ गेला कुठे ? होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:56 IST

Chandrapur : गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जातो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यासाठी तांदळाची मागणी केली आहे. मात्र जिल्ह्यात ८३९.८५ टन तांदूळ साठा शिल्लक असल्याने आणि तो पुरेसा असल्याने राज्यस्तरावरून तांदूळ दूळ देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे हा शिल्लक साठा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी केळकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

कोणताही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहता कामा नये, वेळप्रसंगी उसनवारी करा, लोकसभागातून तांदूळ जमा करून विद्यार्थ्यांना पोषण आहार द्या, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुधारावे, कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी पंधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दर दिवशी वेगवेगळा मेणू ठरवून देण्यात आला आहे. यातून शारीरिक, मानसिक क्षमता सुधारण्यास मदत होत आहे.

उसनवार करा, पण आहार द्याकोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहू नये, याची काळजी घ्यावी. शेजारील ज्या शाळांमध्ये अतिरिक्त तांदूळ असेल त्या शाळांतून उसनवारी करावी, आवश्यक असेल तर समायोजन करावे, लोकसहभाग घ्यावा; पण विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

असा आहे जिल्ह्यात तांदळाचा साठाजिल्ह्यात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत ३१ मार्च २०२४ अखेरचा शिल्लक साठा व दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाटप केलेल्या तांदळापैकी वापर केलेला तांदूळ वजा जाता १ जानेवारी २०२५ ला जिल्ह्यात ८३९.८६ मे.टन तांदूळ शिल्लक होता. जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२५ ची तांदळाची मागणी ८०९.११ होती. यानुसार शिल्लक साठा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ करिता पुरेसा आहे. असे असतानाही शाळांनी मागणी केली आहे.

राज्यस्तरावरून तांदूळ देण्यास असमर्थताजानेवारी, फेब्रुवारी २०२५ करिता जिल्ह्यात ८३९.८५ मे टन तांदूळ शिल्लक असतानाही, मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर फेब्रुवारी २०२५ च्या पूर्वाधात शाळास्तरावर तांदूळ संपला असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहे. शिल्लक तांदूळ असतानाही मागणी केल्याने राज्यस्तरावर जिल्ह्याला तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर