शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पोषण आहाराचा तांदूळ गेला कुठे ? होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:56 IST

Chandrapur : गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जातो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यासाठी तांदळाची मागणी केली आहे. मात्र जिल्ह्यात ८३९.८५ टन तांदूळ साठा शिल्लक असल्याने आणि तो पुरेसा असल्याने राज्यस्तरावरून तांदूळ दूळ देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे हा शिल्लक साठा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी केळकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

कोणताही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहता कामा नये, वेळप्रसंगी उसनवारी करा, लोकसभागातून तांदूळ जमा करून विद्यार्थ्यांना पोषण आहार द्या, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुधारावे, कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी पंधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दर दिवशी वेगवेगळा मेणू ठरवून देण्यात आला आहे. यातून शारीरिक, मानसिक क्षमता सुधारण्यास मदत होत आहे.

उसनवार करा, पण आहार द्याकोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहू नये, याची काळजी घ्यावी. शेजारील ज्या शाळांमध्ये अतिरिक्त तांदूळ असेल त्या शाळांतून उसनवारी करावी, आवश्यक असेल तर समायोजन करावे, लोकसहभाग घ्यावा; पण विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

असा आहे जिल्ह्यात तांदळाचा साठाजिल्ह्यात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत ३१ मार्च २०२४ अखेरचा शिल्लक साठा व दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाटप केलेल्या तांदळापैकी वापर केलेला तांदूळ वजा जाता १ जानेवारी २०२५ ला जिल्ह्यात ८३९.८६ मे.टन तांदूळ शिल्लक होता. जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२५ ची तांदळाची मागणी ८०९.११ होती. यानुसार शिल्लक साठा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ करिता पुरेसा आहे. असे असतानाही शाळांनी मागणी केली आहे.

राज्यस्तरावरून तांदूळ देण्यास असमर्थताजानेवारी, फेब्रुवारी २०२५ करिता जिल्ह्यात ८३९.८५ मे टन तांदूळ शिल्लक असतानाही, मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर फेब्रुवारी २०२५ च्या पूर्वाधात शाळास्तरावर तांदूळ संपला असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहे. शिल्लक तांदूळ असतानाही मागणी केल्याने राज्यस्तरावर जिल्ह्याला तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर