शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

पोषण आहाराचा तांदूळ गेला कुठे ? होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:56 IST

Chandrapur : गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जातो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यासाठी तांदळाची मागणी केली आहे. मात्र जिल्ह्यात ८३९.८५ टन तांदूळ साठा शिल्लक असल्याने आणि तो पुरेसा असल्याने राज्यस्तरावरून तांदूळ दूळ देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे हा शिल्लक साठा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी केळकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

कोणताही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहता कामा नये, वेळप्रसंगी उसनवारी करा, लोकसभागातून तांदूळ जमा करून विद्यार्थ्यांना पोषण आहार द्या, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुधारावे, कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी पंधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दर दिवशी वेगवेगळा मेणू ठरवून देण्यात आला आहे. यातून शारीरिक, मानसिक क्षमता सुधारण्यास मदत होत आहे.

उसनवार करा, पण आहार द्याकोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी उपाशी राहू नये, याची काळजी घ्यावी. शेजारील ज्या शाळांमध्ये अतिरिक्त तांदूळ असेल त्या शाळांतून उसनवारी करावी, आवश्यक असेल तर समायोजन करावे, लोकसहभाग घ्यावा; पण विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

असा आहे जिल्ह्यात तांदळाचा साठाजिल्ह्यात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत ३१ मार्च २०२४ अखेरचा शिल्लक साठा व दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाटप केलेल्या तांदळापैकी वापर केलेला तांदूळ वजा जाता १ जानेवारी २०२५ ला जिल्ह्यात ८३९.८६ मे.टन तांदूळ शिल्लक होता. जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२५ ची तांदळाची मागणी ८०९.११ होती. यानुसार शिल्लक साठा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ करिता पुरेसा आहे. असे असतानाही शाळांनी मागणी केली आहे.

राज्यस्तरावरून तांदूळ देण्यास असमर्थताजानेवारी, फेब्रुवारी २०२५ करिता जिल्ह्यात ८३९.८५ मे टन तांदूळ शिल्लक असतानाही, मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर फेब्रुवारी २०२५ च्या पूर्वाधात शाळास्तरावर तांदूळ संपला असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहे. शिल्लक तांदूळ असतानाही मागणी केल्याने राज्यस्तरावर जिल्ह्याला तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर