शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचा उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 6:00 AM

मार्च एन्डींगमुळे जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मंजूर व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. मिनी मंत्रालयातील कामे पूर्ण पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समन्वय अत्यावश्यक ठरतो. मात्र, जिल्हा परिषदेत जि.प. अध्यक्षांनीच मंजूर कामांच्या याद्या स्वत:कडे ठेवून घेतल्या ग्रामीण भागातील बांधकाम विभागाशी निगडीत अनेक कामांना ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देबांधकामांच्या याद्या अध्यक्षांकडे : ग्रामीण भागातील कामे रखडणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर १७ जानेवारीला पहिल्या यादीतील कामांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, मार्च एन्डींगला काही दिवस शिल्लक असताना ४०० पेक्षा अधिक मंजूर कामांच्या याद्या जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्वत:कडे निर्णयार्थ ठेवल्या. शिल्लक निधी खर्च करण्यात जि. प. अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी सदस्यांकडून होत असताना कामांच्या यादा राखून ठेवल्याने बांधकाम समितीचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मार्च एन्डींगमुळे जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मंजूर व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. मिनी मंत्रालयातील कामे पूर्ण पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समन्वय अत्यावश्यक ठरतो. मात्र, जिल्हा परिषदेत जि.प. अध्यक्षांनीच मंजूर कामांच्या याद्या स्वत:कडे ठेवून घेतल्या ग्रामीण भागातील बांधकाम विभागाशी निगडीत अनेक कामांना ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, महिला व बालकल्याण, इतर विभागातील शाळा, अंगणवाडी, रस्ते, नवीन इमारती व दुरुस्तीची कामे काही महिन्यांपूर्वी मंजूर झाली आहे. ही कामे बांधकाम विभागाच्या माध्यमातून करायची असल्याने या विभागाकडून कार्यवाही पूर्ण झाली. सुमारे ५०० ते ७०० कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.या कामांसंदर्भात १७ जानेवारीला पहिल्या यादीतील १०० ते १५० कामांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्यानंतर ५ मार्चपर्यंत कुठल्याही कामांची निविदा निघाल्या नसून कामे अडगळीत पडली आहेत. मार्च एन्डींगला काही दिवस शिल्लक आहे. मंजूर कामांसाठी शासनाकडून निधी आला असताना जि.प. अध्यक्षांनी कामांच्या याद्या स्वत:कडे ठेवण्यामागे कारण असा प्रश्न काही सदस्यांनी सभेत उपस्थित केला.

कामांच्या याद्यावरून सभेत रणकंदनबांधकाम विभागातील मंजूर कामांबाबत गुरुवारी झालेल्या बांधकाम समितीच्या सभेत चर्चा झाली. सदर विषयावर जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता पवार यांनी मंजूर कामांच्या याद्या जि. प. अध्यक्षांकडे दिल्याने निविदा काढल्या नाही, अशी माहिती दिली. दरम्यान, वित्त व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांना विचारले असता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण सुरू असून मंजूर कामे निश्चितपणे होणार असल्याची माहिती ‘लोकमत’ ला दिली.जि. प. च्या विविध विभागातंर्गत शेकडो कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र, १७ जानेवारीपासून एकही कामाच्या निविदा न काढल्या नाही. या महत्त्वपूर्ण प्रश्नाबाबत अध्यक्षांकडून बांधकाम समितीला बगल देण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे.- प्रमोद चिमूरकर, सदस्य जि. प. चंद्रपूर

टॅग्स :zpजिल्हा परिषद