शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दारूने काय साध्य होऊ शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

चंद्रपूर ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. दारुबंदीमुळे साडेतीनशे कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर परिणाम झाल्याचा दावा सरकारने ...

चंद्रपूर ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. दारुबंदीमुळे साडेतीनशे कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर परिणाम झाल्याचा दावा सरकारने केला होता. दारूबंदी उठविल्याने जिल्ह्याला महसूल वाढण्याची आशा निर्माण झाली. कोट्यवधींचा महसूल विकासकामांसाठी बळ देऊ शकतो, असेही दावे केले जात आहेत.

पर्यटनाला चालना मिळेल

देशातील अनेक जिल्ह्यांना पर्यटनामधून महसूल बराच महसूल मिळतो. चंद्रपुरात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प असल्याने जगभरातील पर्यटक येतात. जिल्ह्याचा महसूल वाढविण्यासाठी पर्यटकांच्या दृष्टीने उपयुक्त सरकार काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक दारुबंदीमुळे जिल्ह्याबाहेर मुक्कामी राहतात. हा प्रकार थांबू शकतो, असा दावा काही वनाधिकाऱ्यांनीही केला आहे.

तस्करीला आळा बसेल

दारुबंदी केवळ कागदावरच होती. त्यामुळे तस्करी वाढली. तस्करीमध्ये बेरोजगार युवकांचा वापर केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातही दारू तस्करीसाठी बालकांचा वापर सुरू आहे. दारुबंदी उठविल्यानंतर तस्करीला आळा बसू शकते, अशी धारणा जोपासणाऱ्या नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

गुन्हेगारीला आळा बसेल

दारूबंदी असल्याने टोळ्यांनी चंद्रपुरात दारू पुरवठा करण्यासाठी वाॅर्ड वाटून घेतले आहेत. हाच प्रकार ग्रामीण भागातही सर्रासपणे सुरू आहे. चंद्रपूर शहरातील काही वाॅर्ड तर केवळ दारू विक्रीसाठी कुख्यात आहेत. दारू तस्करीतून गुन्हेगारी वाढली. सरकारच्या निर्णयामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होऊ शकतो.

पोलिसांना दाखवावी लागेल कर्तबगारी

दारुबंदी असूनही सर्रास दारू मिळत असल्याने पोलीस प्रशासनच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. काही दिवस कारवाया झाल्यानंतर पुन्हा दारूविक्री सुरू होते. सरकारने दारुबंदी उठविल्याने अवैध दारूविक्री रोखून पोलीस प्रशासनाला कर्तबगारी दाखवावी लागणार आहे.

दारूमुळे महिला असुरक्षित

दारूमुळे स्त्रियांवर अत्याचार होतात. जिथे दारू मिळते तिथे स्त्रिया असुरक्षित राहतात. त्यामुळे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. दारूबंदी उठविल्याने महिलांच्या गुन्ह्यात पुन्हा वाढ होण्याचा धोका महिला व युवतींनी वर्तविला आहे.