शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी दुरूस्तीचा अध्यादेश निष्प्रभ

By admin | Updated: June 13, 2015 01:20 IST

२०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. त्या दुरूस्त करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तत्कालिन राज्य सरकाने अध्यादेश काढला खरा,

२०१२-१३ मधील नुकसानीचा वर्षभराने जीआर : अवधी मिळाला केवळ सात महिन्यांचागोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर२०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. त्या दुरूस्त करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तत्कालिन राज्य सरकाने अध्यादेश काढला खरा, मात्र वर्षभराने निघालेल्या या अध्यादेशाची मुदत केवळ सात महिन्यांची असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या विहिरींची कसलीही कामे झाली नाहीत. परिणामत: हा अध्यादेशच निष्प्रभ ठरला.राज्याच्या नियोजन विभागाच्या रोजगार हमी प्रभागाने २३ मे २०१४ रोजी हा अध्यादेश काढला होता. २०१२-१३ या वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतात गाळ साचून अनेकांच्या विहिरी बुजल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. शेतकऱ्यांंनी नुकसान भरपाईसाठी ओरड केल्यावर तत्कालिन राज्य सरकाने मदत जाहीर केली होती. बुजलेल्या विहिरीतील गाळ उपसण्याचे आणि खचलेल्या विहिरी बांधण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता करायला तब्बल वर्ष उलटले. २३ मे २०१४ रोजी या संबंधी परिपत्रक राज्य सरकारच्या नियोजन विभागाने प्रसिद्ध केले. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत विहिरींची सर्व कामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परिपत्रक निघाल्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त सात महिन्यांचा अवधी मिळाल्याने यंत्रणेला कसलीलही कामे करता आली नव्हती. अशातच मुदत उलटून गेल्याने हा अध्यादेशच प्रभावहीन ठरल्याची बाब आता पुढे आली आहे.शासन निर्णयानुसार, अतिवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींचा महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करावयाचा होता. या विहिरींची नोंद सात-बारावरून कमी करायची होती. खचलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरूस्त करायच्या होत्या. त्यासाठी किमान दीड लाख रूपयानचे अंदाजपत्रक तयार करायचे होते. विहिरींच या दुरूस्तीची काम करताना ग्रामसभेची शिफारस आणि ग्रामपंचायतींची मान्यता आवश्यक होती. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमूक्त जाती, दारिद्रय रेषेखालीेल कुटूंब, स्त्री कर्ता असलेले कुटूंब, जमीन सुधारणेचे लाभार्थी, अपंग व्यक्ती, इंदीरा आवास योजनेतील लाभाथीर यांना प्राधान्य द्यायचे होते. यासाठी पूर्णत: निधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनच खर्च करायचा असल्याने राज्याच्या तिजोरीवर फारसा भारही पडणार नव्हता. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.शेतकरी उपेक्षितचशेतकऱ्यांना कर्जाच्या आणि दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकार योजना राबवित असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात असे विपरित चित्र आहे. यामुळे शेतकरी उपेक्षितच आहे. मात्र या कामासाठी फक्त सात महिन्यांची मुदत मिळाली. या अल्प मुदतीमध्ये कसलेही सर्व्हेक्षण होऊ शकले नाही, परिणामत: कामही झाले नसल्याची बाब पुढे आली आहे.