शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनवू

By admin | Updated: July 26, 2016 01:04 IST

जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे.

सुधीर मुनगंटीवार : पोंभूर्णा इको-पार्कच्या भिंतीचे भूमिपूजनचंद्रपूर : जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे. वृक्ष लागवडीला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील उघड्या टेकड्या हिरव्यागार करण्याच्या प्रयत्न असून वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे इको-पार्कच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. वनविभागाच्या कोणत्याही कामाचे भुमिपूजन किंवा शुभारंभ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या हाताने करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी वामन गेडाम व तानाजी रोहनकर यांच्या हस्ते झाले असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस केली.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, पोंभुर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आदी उपस्थित होते.पोंभुर्णा शहरानजीक खनिज विकास निधीतून ९ हेक्टरवर २ कोटी ८३ लक्ष खर्च करून सदर पार्क तयार करण्यात येणार आहे. सदर पार्क वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. राज्यभर वनविभागाची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे. या संपत्तीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवू शकतो, परंतु त्यादृष्टीने यापुर्वी प्रयत्नच केले गेले नाही. आता मात्र यावर भर दिला जात असून तसे नियोजनही केल्या जात आहे. पोंभुर्णा ते आक्सापूर हा राज्यातील अत्याधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता होणार असल्याचेही ते म्हणाले. पोंभुर्णा येथे पहिले टेलीमेडीसीन केंद्र बनविण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तुळशीराम दुधकोर या तेंदु मजूरास धनादेशाचे वितरण करण्यात आले. पार्क परिसराची पाहणी करून पालकमंत्र्यांनी वृक्षारोपनही केले. (स्थानिक प्रतिनिधी)तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानेजिल्ह्यात तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानाची निर्मिती केली जात आहे. पोंभुर्णासह तीन ठिकाणी इको-पार्क तयार केले जात आहे. बॉटनिकल गार्डनचाही प्रस्ताव आहे. जिल्ह्यात जैवविविधतेचा अभ्यास करणारे उद्याने निर्माण केली जाणार आहे. निसर्गाने दिलेल्या जैवविविधतेचे जिल्हा ज्ञानसाधना केंद्र बनतील, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.