शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनवू

By admin | Updated: July 26, 2016 01:04 IST

जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे.

सुधीर मुनगंटीवार : पोंभूर्णा इको-पार्कच्या भिंतीचे भूमिपूजनचंद्रपूर : जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे. वृक्ष लागवडीला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील उघड्या टेकड्या हिरव्यागार करण्याच्या प्रयत्न असून वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे इको-पार्कच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. वनविभागाच्या कोणत्याही कामाचे भुमिपूजन किंवा शुभारंभ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या हाताने करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी वामन गेडाम व तानाजी रोहनकर यांच्या हस्ते झाले असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस केली.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, पोंभुर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आदी उपस्थित होते.पोंभुर्णा शहरानजीक खनिज विकास निधीतून ९ हेक्टरवर २ कोटी ८३ लक्ष खर्च करून सदर पार्क तयार करण्यात येणार आहे. सदर पार्क वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. राज्यभर वनविभागाची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे. या संपत्तीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवू शकतो, परंतु त्यादृष्टीने यापुर्वी प्रयत्नच केले गेले नाही. आता मात्र यावर भर दिला जात असून तसे नियोजनही केल्या जात आहे. पोंभुर्णा ते आक्सापूर हा राज्यातील अत्याधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता होणार असल्याचेही ते म्हणाले. पोंभुर्णा येथे पहिले टेलीमेडीसीन केंद्र बनविण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तुळशीराम दुधकोर या तेंदु मजूरास धनादेशाचे वितरण करण्यात आले. पार्क परिसराची पाहणी करून पालकमंत्र्यांनी वृक्षारोपनही केले. (स्थानिक प्रतिनिधी)तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानेजिल्ह्यात तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानाची निर्मिती केली जात आहे. पोंभुर्णासह तीन ठिकाणी इको-पार्क तयार केले जात आहे. बॉटनिकल गार्डनचाही प्रस्ताव आहे. जिल्ह्यात जैवविविधतेचा अभ्यास करणारे उद्याने निर्माण केली जाणार आहे. निसर्गाने दिलेल्या जैवविविधतेचे जिल्हा ज्ञानसाधना केंद्र बनतील, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.