शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

वेकोलिचे ओव्हरबर्डन उठताहेत जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:14 IST

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे.

ठळक मुद्देनदीपात्राजवळ सुरक्षा भिंत आवश्यक : आदेश दिला; मात्र कारवाई थातूरमातूर

रवी जवळे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे. जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी वेकोलिला ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र आजही वेकोलिचे ओव्हरबर्डन उभेच आहे. आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. आणखी उन्हाळा शिल्लक आहे. त्यामुळे वेकोलिने या कालवधीत हे ढिगारे काढावे, अशी मागणी केली जात आहे.चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा नेहमी फटका बसतो. यंदा पाऊस अत्यल्प पडला. पूरपरिस्थिती उदभवली नाही. तरीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.चंद्रपूर जिल्ह्यात माजरीपासून सास्तीपर्यंत वेकोलिच्या खदानी आणि त्यांनी उभे केलेले ओव्हरबर्डन दिसून येतात. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाºयांमार्फत वेकोलिला सदर ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिने या संदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्च २०१४ रोजी एक तातडीची बैठक घेऊन ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे यावर चर्चा केली होती. याला आज तीन वर्षांचा कालवधी लोटला आहे. मात्र या संदर्भात अद्याप काहीही होऊ शकले नाही, हे चंद्रपूरकरांचे दुर्दैव.सध्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी हे काम हातात घेण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात हे काम बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू होणार आहे. वेकोलिनेही आपले ढिगारे काढले तर पावसाळ्यात पुराची भीती कमी होईल.उल्लेखनीय असे की निरीच्या चमूनेही चंद्रपूरच्या प्रदूषणाची पाहणी केली असता त्यांनीही वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेकोलिला नोटीस देऊन सदर ढिगारे ४५ मीटरपर्यंत हटविण्यास सांगितले होते.जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच नदीचा गाळ काढून ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. परंतु चंद्रपुरात पुरासाठी कारणीभूत असलेले माना खाणीमुळे निर्माण झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याचे दिसते.कायद्याचा विसरजल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. पूर रेषेच्या आत ढिगारे ठेवता येत नाही. त्यासाठी मजबुत संरक्षक भिंत बांधावी लागते. दूषित पाणी साठविण्यासाठी तळे आणि ओव्हरबर्डनवर वृक्षारोपण करावे लागते. परंतु वेकोलिने कधीच याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चंद्रपूर सातत्याने प्रदूषित होत राहिले व पुराचा सामना करीत राहिले.ढिगाऱ्यावर वन्यजीवांचा वावरवेकोलिचे काही ओव्हरबर्डन शहराच्या काही अंतरावरच उभे आहेत. या ढिगाऱ्यावर झुडुपे वाढली आहेत. यात बिबट, अस्वल, रानडुकरे यासारखे वन्यप्राणी दडून बसण्याची शक्यता असते. यापूर्वी माना टेकडी परिसरात बिबट्याचा वावर अशाच ढिगाºयात असल्याचे स्पष्ट झाले होते.वेकोलिने वर्धा नदीपात्राजवळ ओव्हरबर्डन उभे केले आहे. नदीजवळचे ओव्हरबर्डनमुळे नदीतील पाणी दूषित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मागे हे ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिने थातूरमातूर कार्यवाही केली. सुरक्षा भिंतही बांधली नाही.- सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रिन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.नदीपात्रापासून ५० मीटर अंतरापर्यंत ओव्हरबर्डन नसले पाहिजे. वेकोलिला बाऊंडरी वॉल बांधायचे आधीच निर्देश दिले आहेत. आपण सध्या शहराबाहेर आहोत. आल्यावर याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करता येईल.-आशुतोष सलील,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.