शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 10:19 IST

कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातच बांधला मातीचा रपटा

रवी जवळे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.चंद्रपुरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदी पूर्वी या चांदागडची जीवदायिनी होती तर आता इरई नदी चंद्रपूरकरांची तहान भागवित आहे. असे असतानाही या दोन्ही नद्यांची उद्योगांनी वाट लावली आहे. इरई नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. बल्लारपूर पेपरमील, चंद्रपूर वीज केंद्रामधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. इरई वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्यामुळे अखेर शासनाला याबाबत गंभीर व्हावे लागले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. काही प्रमाणात इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. अजूनही हे काम अपूर्णच आहे. अशातच आता वेकोलिने पुन्हा एक संतापजनक प्रकार केला आहे.वेकोलिच्या चंद्रपूर शहराला सभोवताल खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर हे उपक्षेत्र येते. या उपक्षेत्रात पायली, भटाळी येथे खुल्या कोळसा खाणी आहेत. भटाळी कोळसा खाणीकडे जाताना भटाळी गावामधून जावे लागते. इरई धरण- ताडोबा व्याघ्र प्रकल्प या जोडरस्त्याच्या बाजुने भटाळी गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रपट्याच्या काही अंतरावर केवळ दोन पाईप टाकून इरई नदीच्या पात्रातच मातीचा रपटा बनविला आहे. यामुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र व पाण्याचा प्रवाह अडला आहे. या रपट्यावरून वेकोलिचीवाहने मार्गक्रमण करीत आहेत. वास्तविक, कुठल्याही नदी वा तिच्या प्रवाहासोबत अशी छेडछाड करता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासन, सिंचन विभाग आदींची परवानगी घ्यावी लागते. मात्र असे काहीही न करता वेकोलिने आपल्या स्वार्थासाठी थेट इरईचा प्रवाहच अडवून धरला आहे.

वेकोलिने पूल बांधावाभटाळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रपटा आहे. या रपट्याजवळच वेकोलिने मोठा पुल बांधल्यास इरईच्या पात्राला धक्का लागणार नाही. मात्र पैसे वाचविण्यासाठी तसे न करता सरळ नदीपात्रातच मातीचा रपटा बांधून वेकोलि अधिकारी मोकळे झाले आहेत.

यापूर्वीही केला होता असाच प्रकारवेकोलिने यापूर्वी माना खाणीजवळ इरई नदीच्या काठावर माती टाकण्यासाठी रपटा तयार केला होता. तेव्हा वृक्षाई, इरई नदी बचाव जनआंदोलन या पर्यावरणवादी संघटनेने त्याला कडाडून विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’नेही वेकोलिच्या या संताजनक प्रकाराकडे लक्ष वेधले होते.

भटाळीजवळच्या इरई नदी पात्रात रपटा करण्यासाठी वेकोलिने कुठल्याही प्रकारची परवानगी मागितलेली नाही. वास्तविक सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही नदीच्या पात्राला हात लावता येत नाही.- संतोष खांडरे,तहसीलदार, चंद्रपूर.इरई नदी वाचविण्यासाठी वारंवार आंदोलने केली. नदीपात्रात बसून सत्याग्रह केला. आता इरई नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे. असे असताना दुसरीकडे वेकोलिने पात्रातच रपटा तयार करून नदीला अडविले. हा प्रकार संतापजनक आहे.- कुशाब कायरकरअध्यक्ष, वृक्षाई संस्था, चंद्रपूर.

टॅग्स :riverनदी