शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली.

ठळक मुद्देआठ एकरात नऊ लाखांचे उत्पादन, बेरोजगारीवर मात करून फुलविली टरबूज शेती

अमोद गौरकर।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : वडिलांनी शेती पिकवून मुलाला उच्चशिक्षित केले. नोकरी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण झाले नाही. अखेर मुलांनीच वडीलाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी नदीच्या पात्रात पिकणारी टरबूज शेती थेट शेतीच्या बांधावर पिकवून उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने टरबूज शेती करण्याचा सल्ला दिला. नदीपात्रात पिकणारे टरबूज शेतीच्या बंधावर कसे पिकवायचे याची माहिती दिली. त्यामुळे रब्बी हंगामात टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या आठ एकर शेतात लागवड केली.हर्षल माने यांच्यासोबतच शंकरपूचे मंडळ अधिकारी आर. के. निखारे, कृषी सहाय्यक पी. टी. भगत, पी. वाय. नंद, वाय. डब्लू रघुते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यात आठ एकरमध्ये नऊ लाखांचे पीक घेतले. यांच्या सोबतच बाळू पांगुळ यांनीही टरबूज लागवड करून भरघास पीक घेतले. नदी पात्रात टरबूज शेती केल्याने पाणी कमी लागते. मात्र, शेतीत याचा खर्च वाढण्याचा धोका असतो. अशावेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टरबूजसाठी पोषक ठरले. मनात इच्छा असली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळत असते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने व नवनवीन पिके घेऊन शेती करावी, असे आवाहन रोशन पांगुळ यांनी केले.लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटलेनदीपात्राऐवजी शेतात टरबूज लागवड केल्याने यासाठी चार लाखांचा खर्च आला. खर्च वजा करून पाच लाखांचा नफा झाला. हा नफा पुन्हा वाढला असता. परंतु, लॉकडाऊनमुळे मोठी बाजारपेठ मिळाली नाही, अशी माहिती रोशन पांगुळ यांनी दिली.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती टाळावीचिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. अनेक शेतकºयांचा शेती करण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असल्याने दरवर्षी मोठे नुकसान होते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी नवीन नगदी पिके घ्यावी, असा सल्ला रोशन पांगुळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती