शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली.

ठळक मुद्देआठ एकरात नऊ लाखांचे उत्पादन, बेरोजगारीवर मात करून फुलविली टरबूज शेती

अमोद गौरकर।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : वडिलांनी शेती पिकवून मुलाला उच्चशिक्षित केले. नोकरी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण झाले नाही. अखेर मुलांनीच वडीलाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी नदीच्या पात्रात पिकणारी टरबूज शेती थेट शेतीच्या बांधावर पिकवून उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने टरबूज शेती करण्याचा सल्ला दिला. नदीपात्रात पिकणारे टरबूज शेतीच्या बंधावर कसे पिकवायचे याची माहिती दिली. त्यामुळे रब्बी हंगामात टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या आठ एकर शेतात लागवड केली.हर्षल माने यांच्यासोबतच शंकरपूचे मंडळ अधिकारी आर. के. निखारे, कृषी सहाय्यक पी. टी. भगत, पी. वाय. नंद, वाय. डब्लू रघुते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यात आठ एकरमध्ये नऊ लाखांचे पीक घेतले. यांच्या सोबतच बाळू पांगुळ यांनीही टरबूज लागवड करून भरघास पीक घेतले. नदी पात्रात टरबूज शेती केल्याने पाणी कमी लागते. मात्र, शेतीत याचा खर्च वाढण्याचा धोका असतो. अशावेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टरबूजसाठी पोषक ठरले. मनात इच्छा असली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळत असते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने व नवनवीन पिके घेऊन शेती करावी, असे आवाहन रोशन पांगुळ यांनी केले.लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटलेनदीपात्राऐवजी शेतात टरबूज लागवड केल्याने यासाठी चार लाखांचा खर्च आला. खर्च वजा करून पाच लाखांचा नफा झाला. हा नफा पुन्हा वाढला असता. परंतु, लॉकडाऊनमुळे मोठी बाजारपेठ मिळाली नाही, अशी माहिती रोशन पांगुळ यांनी दिली.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती टाळावीचिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. अनेक शेतकºयांचा शेती करण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असल्याने दरवर्षी मोठे नुकसान होते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी नवीन नगदी पिके घ्यावी, असा सल्ला रोशन पांगुळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती