शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

जलजीवन मिशन देणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते.

ठळक मुद्देग्रामीण भागातील पाण्याची पायपीट थांबणार : प्रत्येक नमुना ८ च्या नोंदीला नळ कनेक्शन

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे मिशन शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात येणार असून पाणीपुरवठयासाठी प्रत्येक गावाच्या कृती आराखडयासह जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंच यांनी कृती आराखडा तयार करायचा आहे. २६ जानेवारीच्या सभेत या आराखडयावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये नळ योजना असतील, पण या योजना अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणी पुरवठयासाठी सुधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजना तयार करताना प्रति माणसी ४० लिटर पाणी पुरवठयाचे नियोजन केले जाते. आता प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील जनावरांची संख्या, त्यांना लागणारे पाणी आदींचाही विचार करावा लागणार आहे.गावच्या कृती आराखडयाबरोबरच जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. तसे निर्देश जिल्हा परिषदांना शासनाने दिले आहेत. या आराखडयामध्ये सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक, घरगुती नळ जोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरणात्मक आराखडा व त्यासोबतचा त्रैमासिक, वार्षिक आराखडा तयार करणे, भूजलावर आधारित पाणी पुरवठा योजना करावयाची गावे निश्चित करणे, जिल्हांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या विविध उपांगांचे नमुना अंदाज पत्रक तयार करणे आदींचा समावेश आहे. या योजनेचा आता नागरिकांनी लाभ घेण्याची गरज आहे.नवीन पाणीपुरवठा योजनांचा कालावधी निश्चितस्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी १८ महिने व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी ३६ महिन्यांचा जास्तीत जास्त कालावधी राहणार आहे. ज्या पाणी पुरवठा योजनांना तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशा योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे आवश्यक आहे. ज्या योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे शक्य नाही, अशा योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे.५० लोकांच्या वाडीचाही होणार विचारगावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडीवस्तीवरील घरांचाही विचार कृती आराखडयात करावा लागणार आहे. त्या लोकांना पाणी कसे द्यायचे, गावालगतचा पाण्याचा स्रोत कोणता, पाईपलाईन कुठून व कशी आणता येईल, या मुद्यांवर विचार केला जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणी