रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे मिशन शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात येणार असून पाणीपुरवठयासाठी प्रत्येक गावाच्या कृती आराखडयासह जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंच यांनी कृती आराखडा तयार करायचा आहे. २६ जानेवारीच्या सभेत या आराखडयावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये नळ योजना असतील, पण या योजना अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणी पुरवठयासाठी सुधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजना तयार करताना प्रति माणसी ४० लिटर पाणी पुरवठयाचे नियोजन केले जाते. आता प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील जनावरांची संख्या, त्यांना लागणारे पाणी आदींचाही विचार करावा लागणार आहे.गावच्या कृती आराखडयाबरोबरच जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. तसे निर्देश जिल्हा परिषदांना शासनाने दिले आहेत. या आराखडयामध्ये सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक, घरगुती नळ जोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरणात्मक आराखडा व त्यासोबतचा त्रैमासिक, वार्षिक आराखडा तयार करणे, भूजलावर आधारित पाणी पुरवठा योजना करावयाची गावे निश्चित करणे, जिल्हांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या विविध उपांगांचे नमुना अंदाज पत्रक तयार करणे आदींचा समावेश आहे. या योजनेचा आता नागरिकांनी लाभ घेण्याची गरज आहे.नवीन पाणीपुरवठा योजनांचा कालावधी निश्चितस्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी १८ महिने व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी ३६ महिन्यांचा जास्तीत जास्त कालावधी राहणार आहे. ज्या पाणी पुरवठा योजनांना तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशा योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे आवश्यक आहे. ज्या योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे शक्य नाही, अशा योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे.५० लोकांच्या वाडीचाही होणार विचारगावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडीवस्तीवरील घरांचाही विचार कृती आराखडयात करावा लागणार आहे. त्या लोकांना पाणी कसे द्यायचे, गावालगतचा पाण्याचा स्रोत कोणता, पाईपलाईन कुठून व कशी आणता येईल, या मुद्यांवर विचार केला जाणार आहे.
जलजीवन मिशन देणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते.
जलजीवन मिशन देणार पाणी
ठळक मुद्देग्रामीण भागातील पाण्याची पायपीट थांबणार : प्रत्येक नमुना ८ च्या नोंदीला नळ कनेक्शन