लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जातो. त्याकरिता शहराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून पाणी उचलले जाते. यासाठी पात्रात तीन विहिरी आहेत. आता पाण्याची पातळी घटत असल्याने बल्लारपुरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. असे झाल्यास इरई धरणातून पाणी घेण्याची तयार मजीप्राने केली आहे.वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त्यामुळे, सध्यातरी येथे पाण्याची टंचाई नाही. शहराला आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे. मात्र, यंदा उन्हाळा चांगलाच तापत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी अधिक खालावत जावून टंचाई निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास यावर मजिप्राने इरई धरणातून पाणी घेण्याचा पर्याय ठेवला आहे. पाण्याबाबत अशी आणीबाणी निर्माण झाल्यानंतर इरई धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडून ते विहिरीने उचलायचे असे ठरले आहे व तशी तयारी करून ठेवली असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांनी'लोकमत'ला दिली आहे. दोन वर्षांपूर्वी, पाणी टंचाईत इरई धरणामधून पाणी उचलावे लागले होते, हे येथे उल्लेखनीय.
बल्लारपूर शहरासाठी इरई धरणातून पाणी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST
वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त्यामुळे, सध्यातरी येथे पाण्याची टंचाई नाही. शहराला आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे.
बल्लारपूर शहरासाठी इरई धरणातून पाणी घेणार
ठळक मुद्देटंचाई निर्माण झाल्यास पर्याय