शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सीमेवरील गावांत पाणी प्रश्न पेटला

By admin | Updated: February 4, 2015 23:11 IST

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले

दोन्ही राज्याचे दुर्लक्ष : नागरिकांना त्राससंघरक्षित तावाडे - जिवतीमहाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले असले तरी अनेक कामे ठप्प आहेत. मुकदमगुडा, परमडोली या गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ मध्ये पाण्याची टाकी उभी केली असून याच टाकीद्वारे जलबंब पाणीपुरवठा सुरु आहे. तर महाराष्ट्र सरकारने याच गावात केवळ अर्धवट टाकी बांधून ठेवल्याने ती शोभेची वस्तु ठरत आहे.जिवती तालुका हा अतिदुर्गम असून पहाडावर वसलेला आहे. या तालुक्याला पाणी टंचाईची झळ दरवर्षी सहन करावी लागत असते. मात्र, महाराष्ट्र शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परमडोली, मुकदमगुडा, लेडीजान, शंकरलोधी, कोटा, लेंडीगुडा, भोलापठार, पद्मावती, पळसगुडा, अंतापूर, तांडा, येसापूर, नारायणगुडा, इंदिरानगर हे जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्र प्रदेश सीमेवर वसलेली वादग्रस्त गावे आहेत. दोन्ही राज्य ही चौदा गावे आपआपल्या राज्यात असल्याचा दावा करीत असले तरी विकासाच्या बाबतीत ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करुन परमडोली येथे केवळ अर्धवट पाण्याची टाकी महाराष्ट्राने शासनाने बांधली आहे. तर दुसरीकडे याच गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ ला पाणी टाकी बांधली. या टाकीद्वारे मुबलक पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाई भासल्यास येथील महिलांना एक ते दोन किमी अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागते.