शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पाणी पुरवठा करणारी विहीर खचली

By admin | Updated: January 4, 2015 23:08 IST

राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे १२ वर्षापूर्वी बांधलेली विहीर खचल्याने हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जानवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

विरुर (स्टे.): राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे १२ वर्षापूर्वी बांधलेली विहीर खचल्याने हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जानवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उपाययोजना करुन पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे जवळपास १२० एवढी लोकसंख्या असून ४० घरे आहेत. या गावात २ विहीरी व ३ हातपंप आहेत. दोन हातपंप बंद स्थितीत आहेत. तीन दिवसापूर्वी गावातील विहिर पूर्णत: खचल्याने गावकऱ्यांना पिण्याचा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.सदर विहीर २००२ मध्ये बांधली असून अवघ्या १२ वर्षातच विहिर खचल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सदर विहिरीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विहिर खचल्याने मागील काही दिवसांपासून नळाचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची भटकंती करावी लागत आहे. शेतातील कामे करावे की, पाणी भरावे असा प्रश्न गावकऱ्यासमोर आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी नागरिक भटकत आहे. नळ योजना बंद असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खचलेली विहीर दुरुस्त करुन नळ योजना त्वरित सुरु करावी तसेच निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)