शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:50 IST

Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आगडी येथे मागील चार दिवसांपासून २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.

कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी २४ ग्रीड पाणीपुरवठा योजना अमलात आणली. जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करीत प्रत्येक कुटुंबाला नळाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र त्या नळाद्वारे कुटुंबाला नियमित पाणीपुरवठा होतो की नाही, याकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा योजना शोभेची वास्तू ठरली असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. गावात दोन विहिरी आहेत. मात्र विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मागील तीन दिवसांपासून २४ ग्रीड पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. 

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. मात्र दोन वर्षातच योजनेला घरघर लागली असून सदर योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

"मागील चार दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरु करावा." - शालिनी दामोधर लेनगुरे, गृहिणी आगडी

"२४ गाव ग्रीड योजनेंतर्गत मौजा जानाळा व आगडी येथे पाणीपुरवठा योजना दोन वर्षापूर्वी अमलात आणली. मात्र गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास सदर योजना अल्पावधीत कुचकामी ठरली असून मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेला सूचना करूनही दुर्लक्ष करीत आहे."- दर्शना किन्नाके, सरपंच ग्रामपंचायत जानाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई