शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:50 IST

Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आगडी येथे मागील चार दिवसांपासून २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.

कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी २४ ग्रीड पाणीपुरवठा योजना अमलात आणली. जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करीत प्रत्येक कुटुंबाला नळाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र त्या नळाद्वारे कुटुंबाला नियमित पाणीपुरवठा होतो की नाही, याकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा योजना शोभेची वास्तू ठरली असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. गावात दोन विहिरी आहेत. मात्र विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मागील तीन दिवसांपासून २४ ग्रीड पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. 

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. मात्र दोन वर्षातच योजनेला घरघर लागली असून सदर योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

"मागील चार दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरु करावा." - शालिनी दामोधर लेनगुरे, गृहिणी आगडी

"२४ गाव ग्रीड योजनेंतर्गत मौजा जानाळा व आगडी येथे पाणीपुरवठा योजना दोन वर्षापूर्वी अमलात आणली. मात्र गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास सदर योजना अल्पावधीत कुचकामी ठरली असून मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेला सूचना करूनही दुर्लक्ष करीत आहे."- दर्शना किन्नाके, सरपंच ग्रामपंचायत जानाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई