शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:50 IST

Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आगडी येथे मागील चार दिवसांपासून २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.

कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी २४ ग्रीड पाणीपुरवठा योजना अमलात आणली. जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करीत प्रत्येक कुटुंबाला नळाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र त्या नळाद्वारे कुटुंबाला नियमित पाणीपुरवठा होतो की नाही, याकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा योजना शोभेची वास्तू ठरली असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. गावात दोन विहिरी आहेत. मात्र विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मागील तीन दिवसांपासून २४ ग्रीड पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. 

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. मात्र दोन वर्षातच योजनेला घरघर लागली असून सदर योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

"मागील चार दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरु करावा." - शालिनी दामोधर लेनगुरे, गृहिणी आगडी

"२४ गाव ग्रीड योजनेंतर्गत मौजा जानाळा व आगडी येथे पाणीपुरवठा योजना दोन वर्षापूर्वी अमलात आणली. मात्र गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास सदर योजना अल्पावधीत कुचकामी ठरली असून मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेला सूचना करूनही दुर्लक्ष करीत आहे."- दर्शना किन्नाके, सरपंच ग्रामपंचायत जानाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई