शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

पाणी पुरवठ्यावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:27 IST

महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, ....

ठळक मुद्देमनपाची आमसभा : विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, अशी मागणी पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने केली होती. हा विषय मनपाच्या सोमवारी झालेल्या आमसभेत चर्चेसाठी ठेवताच काही नगरसेवकांनी याला विरोध केला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या विषयावरून मतभेद निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला.चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभेला सुरुवात होताच पाणी पुरवठ्याच्या वाढीव विद्युत दरामुळे निर्माण झालेली तफावत व ती रक्कम देण्याचा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला. परंतु, या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांतच मतभेद दिसून आला. शहराला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट २०११ मध्ये उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित करण्यात आले. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे वीज दरात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून वाढीव वीज दराची तफावत रक्कम देण्याची मागणी पाणीपुरवठा कंत्राटदाराने प्रशासनाकडे केली आहे. यानंतर १८ डिसेंबर २०१५ मध्ये तफावत रक्कम देण्यासंदर्भात आमसभेत चर्चा झाली. त्यावेळी गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर रक्कम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. नंतर १९ सप्टेंबर २०१६ च्या आमसभेत नगरपालिका आणि महानगरपालिका काळातील वीज दर तपासून तफावत रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आजच्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी करारात तफावत रक्कम देण्याचे ठरले नसल्याचे सांगत विरोध दर्शविला. आणखी काही नगरसेवकांनीही याला विरोध दर्शविला. यापूर्वी दोनदा झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता पुन्हा तोच विषय चर्चेसाठी आणून सभागृहाचा अवमान केला जात असल्याचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी म्हटले. या विषयावरून चांगलाच गोंधळ झाल्याने महापौर अंजली घोटेकर यांनी प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा, असे जाहीर केले. तसेच जुने कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटाची निविदा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा केल्यानंतरच नवीन बांधकामाला मंजुरी देणे आवश्यक होते. परंतु, अनेक नवीन बांधकाम करताना याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा विषय सुनिता लोढिया यांनी उपस्थित केला. तेव्हा महापौर घोटेकर यांनी शहरातील सर्व नवीन बांधकामांची तपासणी करावी. रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा नसलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते.पाण्याच्या टाकीची सुरक्षितता तपासणारयानंतर नेताजी सुभाषचंद्रबोस शाळेची जीर्ण इमारत पाडून तेथे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडगाव पाण्याच्या टाकीवरून सोनू सोनवणे या १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. त्यामुळे टाकीच्या परिसरात संरक्षण भिंत उभारून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केली. तेव्हा महापौरांनी शहरातील सर्व टाक्यांची पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.रामाळा तलाव परिसरात सुरक्षारक्षकरामाळा तलाव परिसरात स्टंटबाजीमुळे दोन युवकांना जीव गमवावा लागला. मनपाने तलावाचे सौंदर्यीकरण केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला.आर्थिक भुर्दंड नाहीचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून महानगरपालिका पाण्याची उचल करीत आहे. त्यामुळे मलनिस्सारण योजनेंतर्गत निघणारे पाणी देण्याची मागणी वीज केंद्राने मनपाकडे केली होती. २१२ कोटींच्या एसआयटीसीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देखभाल दुरुस्ती करणाºया कंपनीकडेच मनपाचा हिस्सा भरण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे मनपावर कुठलाच आर्थिक भूर्दंड पडणार नसल्याचे आयुक्त विजय देवळीकर यांनी स्पष्ट केले.