शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जीर्ण टाकीतून चिमूरला केला जातो पाणी पुरवठा

By admin | Updated: February 26, 2015 00:44 IST

चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे.

चिमूर : चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीला लागून जिल्हा परिषदेची शाळाही आहे. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.चिमूर येथे १९७२ मध्ये साडेतीन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या लक्षात घेता ही टाकी बांधण्यात आली. या टाकीतून नेहरू वार्ड, आझाद वार्ड, गांधी चौक व गुरुदेव वॉर्डात पाणी पुरवठा केला जातो. टाकी फार जुनी असल्याने टाकी संदर्भात पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत चिमूर यांच्या वतीने डॉ. एस.एस. कुलकर्णी यांना पत्र देऊन या टाकीचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यांनी २३ आॅक्टोबर २००८ मध्ये ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून ही टाकी जीर्ण झाली असून केव्हाही पडण्याची शक्यता त्यांच्या अहवालातून वर्तविली होती. त्यानुसार चिमूर ग्रामपंचायतीने या संदर्भात ठराव घेऊन सदर पाण्याची टाकी पाडण्यात यावी, असे पत्रही संबंधित विभागाला दिले होते. परंतु यावर अजूनपर्यंत कोणतेही कार्यवाही होऊ शकली नाही. पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही ही टाकी अर्धीच भरतात. त्यामुळे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या चार वॉर्डात करण्यात येणारा पाणी पुरवठा अत्यल्प असतो. परिणामी येथील नागरिकांची पाण्यासाठी ओरड होते. उल्लेखनीय असे की या पाण्याच्या टाकीजवळच जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे या शाळेलाही धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी शाळेवर किंवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने वारंवार ठराव घेऊन व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून पाण्याची टाकी पाडण्यास बजाविले आहे. मात्र संबंधित विभागाकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. (शहर प्रतिनिधी)