शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा व वीजबिल शासनानेच भरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

आक्सापूर : राज्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या १५ व्या वित्त आयोग निधीतून पाणीपुरवठा योजना व स्ट्रीट लाईट बिलाचा भरणा ...

आक्सापूर : राज्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या १५ व्या वित्त आयोग निधीतून पाणीपुरवठा योजना व स्ट्रीट लाईट बिलाचा भरणा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केला. हा आदेश रद्द करून सदर निधी हा ग्रामविकासाच्या कामासाठीच खर्च करण्यासंदर्भाचा यापूर्वीचा आदेश कायम ठेवून स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनेचे बिल शासनानेच भरावे, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघाचे विदर्भ सरचिटणीस नीलेश पूलगमकर यांनी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

पुलगमकर यांनी मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रात सांगितल्यानुसार,१५ व्या वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकारमार्फत ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. गावातील मूलभूत समस्या व आवश्यक कामासाठी हा निधी खर्च करण्याची तरतूद असून, हा प्रकार वर्षांनुवर्षांपासून सुरू असताना अचानक महाराष्ट्र शासनाने त्यांच्या २६ जून २०२० व २३ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास मंत्रालयाने नवीन आदेश निर्गमित केला. त्यात १५ व्या वित्त आयोग निधीतून पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट बिलाचा भरणा करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत. या प्रकारातून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसणार आहे. ग्रामीण व्यवस्थेला देशोधडीला लावणारा हा निर्णय असल्याचे नीलेश पुलगमकर यांनी म्हटले आहे.