शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई: चंद्रपूर जिल्ह्यातल्या घनपठार गावातील निम्मे गावकरी गाव सोडून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:54 IST

जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत.

ठळक मुद्देदीड कि.मी. पायी जाऊन आणावे लागते रोजचे पाणीगढूळ पाणी पिऊन जगत आहेत गावकरीप्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क संघरक्षित तावाडे चंद्रपूर: जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत. सध्याची गावातील पाण्याची स्थिती पाहता काही दिवसात उरलेली कुटुंबेही दुसऱ्या गावांच्या आश्रयाला जातील अशी शक्यता तेथे वर्तविली जात आहे.या गावातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. येथे असलेल्या नळांना पाणी नाही. गावातील टाकीत पाणी नाही. जे थोडेफार पाणी आहे ते अतिशय गढूळ व आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असे आहे. त्यामुळे नागरिकांना ररोज दीड कि.मी. ची पायपीट करून रोजचे पाणी भरावे लागत आहे. त्यात डोक्यावर तापणारे उन त्रस्त करत आहे. अशा कारणांमुळे या गावातील जवळपास निम्मी कुटुंबे दुसऱ्या गावांच्या आश्रयाला किंवा जिथे पाणी आहे अशा शेतात रहायला गेली आहेत. या गावात पाण्याची मोठी टाकी होती. मात्र त्या टाकीला मोठे भगदाड पडल्याने व त्याची दुरुस्ती न झाल्याने गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावकरी पहाटे चार वाजता उठून दीड कि.मी. खडतर वाट चालून जातात. तेथे नाल्यात असलेले गढूळ पाणी एका लहानशा भांड्याने भरून घेतात. हेच पाणी आम्ही जनावरांनाही देतो व आम्हीही वापरतो असे त्यांचे सांगणे आहे.येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नाहीत अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. या गावात टँकर सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणी