शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीटंचाई: चंद्रपूर जिल्ह्यातल्या घनपठार गावातील निम्मे गावकरी गाव सोडून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:54 IST

जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत.

ठळक मुद्देदीड कि.मी. पायी जाऊन आणावे लागते रोजचे पाणीगढूळ पाणी पिऊन जगत आहेत गावकरीप्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क संघरक्षित तावाडे चंद्रपूर: जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत. सध्याची गावातील पाण्याची स्थिती पाहता काही दिवसात उरलेली कुटुंबेही दुसऱ्या गावांच्या आश्रयाला जातील अशी शक्यता तेथे वर्तविली जात आहे.या गावातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. येथे असलेल्या नळांना पाणी नाही. गावातील टाकीत पाणी नाही. जे थोडेफार पाणी आहे ते अतिशय गढूळ व आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असे आहे. त्यामुळे नागरिकांना ररोज दीड कि.मी. ची पायपीट करून रोजचे पाणी भरावे लागत आहे. त्यात डोक्यावर तापणारे उन त्रस्त करत आहे. अशा कारणांमुळे या गावातील जवळपास निम्मी कुटुंबे दुसऱ्या गावांच्या आश्रयाला किंवा जिथे पाणी आहे अशा शेतात रहायला गेली आहेत. या गावात पाण्याची मोठी टाकी होती. मात्र त्या टाकीला मोठे भगदाड पडल्याने व त्याची दुरुस्ती न झाल्याने गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावकरी पहाटे चार वाजता उठून दीड कि.मी. खडतर वाट चालून जातात. तेथे नाल्यात असलेले गढूळ पाणी एका लहानशा भांड्याने भरून घेतात. हेच पाणी आम्ही जनावरांनाही देतो व आम्हीही वापरतो असे त्यांचे सांगणे आहे.येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नाहीत अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. या गावात टँकर सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणी