शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरमध्ये २७ गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:46 IST

तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.

ठळक मुद्दे११ प्रभागात पाणीपुरवठा : जीपीएस प्रणालीचा पत्ताच नाही

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.आज घडीला चिमूर तालुक्यातील एकाही गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याचे कागदोपत्री असले तरी बऱ्याच गावांत पाणी टंचाई आहे. येत्या काही दिवसामध्ये पाणी टंचाईचे उग्र रुप दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणी लक्षात घेता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.चिमूर शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने वडाळा, पिंपळनेरी, खरकडा, सोनेगाव-बेगडी यागावांसह अकरा प्रभागात पाणी टंचाई आहे. नगर परिषदेद्वारे टँकरने पाणी पुरवठा करणे सुरु केले आहे. मात्र अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. याठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फसल्या जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केले आहे. टँकर चालकाकडे लाक बुक उपलब्ध असले तरी टँकरवर यंत्रणेचे बॅनर व जीपीएस यंत्रणा लावण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहेमागील तीन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेची लोकसंख्या १५ हजार असून नगर परिषदेमध्ये सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या निर्मितीनंतर टंचाई निर्माण झालेल्या वडाळा, पिंपळनेरी गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. मागील पावसाळ्यात अत्यल्प कोसळलेल्या पावसामुळे शहरालालगत असलेल्या उमा नदीचे पात्र सध्या उथळ झाले आहे .

टॅग्स :water shortageपाणीटंचाई