शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सुमठाणा व सातार्‍यात पाणी टंचाई

By admin | Updated: May 29, 2014 02:09 IST

तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मे महिना सुरु होऊनही प्रशासनाने ठोस उपाययोजना सुरू केली नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. वरोरा शहरातील काही प्रभागात मुबलक पाणी मिळत असल्याने नागरिकांना सहकुटुंब जाऊन दूरवरुन पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावातील हातपंप बंद असल्याचे तक्रार पुस्तिकेवरुन दिसत आहे.

वरोरा तालुक्यातील सुमठाणा गावात गावातीलच विहिरीवरुन नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. या विहिरीमधील पाणी आटत असल्याने नागरिकांना अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत आहे. या विहिरीतील पाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण आटल्याने सुमठाणावासीयांना याच उन्हाळ्यात दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. सातारा गावामध्ये असणार्‍या विहिरीचे पाणी मागील महिन्यात आटले आहे. याबाबत प्रशासनास स्थानिक प्रशासनाने कळविलेही होते. परंतु अद्याप कुठलीही उपाययोजना प्रशासनाने केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातारावासीयांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. उष्णतेचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटणे सुरू झाले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

वरोरा तालुक्यातील जामखुला, टेमुर्डा, बेलगाव, भेंडाळा, तुमगाव, येन्सा, उखर्डा, मुरदगाव, चिकणी, खेमजई, सोनेगाव, पांझुर्णी, बोडखा, पिंपळगाव, मेसा, दादापूर, बोरी, खापरी, जळका, मजरा, आजनगाव आदी गावातील हातपंप नादुरुस्त असल्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या आहेत. परंतु अद्यापही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाही. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या फलकावर स्थानांतर्रित झालेल्या अधिकार्‍यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक कायम असल्याने हा विभाग किती तत्पर आहे, हे दिसून येत आहे.

वारंवार पाण्यासाठी नागरिकांकडून निवेदने दिली जात असतानाही याकडे पाणी पुरवठा विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.