शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

सुमठाणा व सातार्‍यात पाणी टंचाई

By admin | Updated: May 29, 2014 02:09 IST

तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मे महिना सुरु होऊनही प्रशासनाने ठोस उपाययोजना सुरू केली नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. वरोरा शहरातील काही प्रभागात मुबलक पाणी मिळत असल्याने नागरिकांना सहकुटुंब जाऊन दूरवरुन पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावातील हातपंप बंद असल्याचे तक्रार पुस्तिकेवरुन दिसत आहे.

वरोरा तालुक्यातील सुमठाणा गावात गावातीलच विहिरीवरुन नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. या विहिरीमधील पाणी आटत असल्याने नागरिकांना अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत आहे. या विहिरीतील पाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण आटल्याने सुमठाणावासीयांना याच उन्हाळ्यात दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. सातारा गावामध्ये असणार्‍या विहिरीचे पाणी मागील महिन्यात आटले आहे. याबाबत प्रशासनास स्थानिक प्रशासनाने कळविलेही होते. परंतु अद्याप कुठलीही उपाययोजना प्रशासनाने केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातारावासीयांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. उष्णतेचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटणे सुरू झाले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

वरोरा तालुक्यातील जामखुला, टेमुर्डा, बेलगाव, भेंडाळा, तुमगाव, येन्सा, उखर्डा, मुरदगाव, चिकणी, खेमजई, सोनेगाव, पांझुर्णी, बोडखा, पिंपळगाव, मेसा, दादापूर, बोरी, खापरी, जळका, मजरा, आजनगाव आदी गावातील हातपंप नादुरुस्त असल्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या आहेत. परंतु अद्यापही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाही. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या फलकावर स्थानांतर्रित झालेल्या अधिकार्‍यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक कायम असल्याने हा विभाग किती तत्पर आहे, हे दिसून येत आहे.

वारंवार पाण्यासाठी नागरिकांकडून निवेदने दिली जात असतानाही याकडे पाणी पुरवठा विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.